शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

तीन गावे तीन महिन्यांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 5:00 AM

तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या एकताई, सलिता आणि भांडूम या तीन गावांचा तीन महिन्यांपासून विद्युत पुरवठा पूर्णत: खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्येसुद्धा वीजपुरवठा सुरू असल्याचा मोठा गाजावाजा केला. परंतु, मेळघाटातील त्या तीन गावांतील अंधारामुळे तो दावा तद्दन खोटा ठरला आहे.

ठळक मुद्देमेळघाट : महावितरणचा कारभार, जारिदा उपकेंद्र वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : महावितरणच्या बेताल कारभाराचा फटका मेळघाटच्या अतिदुर्गम तीन गावांना बसला आहे. या गावांना विद्युत पुरवठा करणारी केबल वनविभागाच्या वृक्षतोड मोहिमेत तुटल्याने ही गावे तीन महिन्यांपासून अंधारात आहेत. दुसरीकडे तीन वर्षांपासून जारिदा उपकेंद्र अधिकाऱ्यांविना वाऱ्यावर आले आहे.तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या एकताई, सलिता आणि भांडूम या तीन गावांचा तीन महिन्यांपासून विद्युत पुरवठा पूर्णत: खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्येसुद्धा वीजपुरवठा सुरू असल्याचा मोठा गाजावाजा केला. परंतु, मेळघाटातील त्या तीन गावांतील अंधारामुळे तो दावा तद्दन खोटा ठरला आहे.अचलपूर येथील कार्यकारी अभियंता या विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चिखलदरा पंचायत समितीचे सदस्य नानकराम ठाकरे यांनी तक्रारीत केला आहे. एकताई, सलिता, भांडूम या गावांमध्ये पूर्णत: अंधाराचे साम्राज्य आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत हिंस्त्र वन्यप्राणी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून गावानजीक येतात. अंधारात ते दबा धरून बसण्याची शक्यता असल्याने त्यांच्या भीतीखाली आदिवासी जगत आहेत.वीजपुरवठा नसल्याने पाणीपुरवठा योजना व पीठ गिरणीसुद्धा बंद पडल्या आहेत. याशिवाय वीजपुरवठा नसल्याने नागरिकांना इतरांशी संपर्क साधणेदेखील अवघड ठरले असल्याने समस्यांत भर पडली आहे. वनविभागामार्फत जंगलात वृक्षतोड करण्यात आली. त्यामध्ये सदर केबल तुटला. ती जोडणी करण्यासाठी संबंधित कंपनीला आवश्यक असलेले मटेरियल लॉकडाऊनमध्ये मिळाले नाही . लवकरच तिन्ही गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल.- व्ही .एम. बागडे,सहायक अभियंता (महावितरण), परतवाडा

टॅग्स :electricityवीज