शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या टोलमुक्तीची घोषणा हवेतच

By admin | Updated: August 19, 2014 23:26 IST

टोलच्या माध्यमातून कोट्यावधी रूपये सरकारच्या घोषणा हवेतच विरली आहे. मागील जुलै महिन्यात राज्य सरकारने विधानसभेत एसटीला टोलमुक्त करण्याची घोषणा केली होती.

अमरावती : टोलच्या माध्यमातून कोट्यावधी रूपये सरकारच्या घोषणा हवेतच विरली आहे. मागील जुलै महिन्यात राज्य सरकारने विधानसभेत एसटीला टोलमुक्त करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जुलै महिन्यापासून एसटी टोल भरणे बंद करेल असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र एसटीला टोलपासून सुटका मिळालेलीच नाही. राज्यातील विविध टोल नाक्यावर एसटी आजही टोल भरतेच आहे त्यामुळे एसटीच्या टोलमुक्तीची घोषणा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केल्याची चर्चा सुरू झाली आहे. एसटीला टोलमधून वगळण्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली होती. जुलै महिन्यात घोषणा प्रत्यक्षात येणार असल्याचे बोलले जात होते परंतु प्रत्यक्षात आॅगस्ट महिना उजाडला तरीही एसटीला टोल भरणे चुकलेले नाही. राज्यातील ४४ बंद केलेल्या टोल नाक्याचेच पत्र महामंडळाला प्राप्त झाले आहे. त्याउपर टोलमुक्तीच्या घोषणेबाबत काहीही अधिकृत माहिती सरकारकडून मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. टोल नाका चालकांशीही संपर्क केला असता एसटीला टोलमधून वगळण्याबाबत अधिकृत काहीच माहिती नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे राज्य शासनाने विधानसभेत टोलमुक्तीच्या धोरणाबाबत निर्णय घेण्याचे सुतोवाच केले असली तरी प्रत्यक्षात शासन निर्णयाची अंमलबजावणी वेळीच होत नसल्याने याचा फायदा कुठल्याही शासकीय यंत्रणेला असो की सामाजिक नागरिकांना होत नाही. परिणामी घोषणा करुन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)