शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोफियाची वाहतूक शेतकऱ्यांचा कर्दनकाळ

By admin | Updated: December 13, 2014 00:39 IST

शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ असा गाजावाजा करणारी इंडिया बुल्स कंपनी आता शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

नांदगाव पेठ : शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ असा गाजावाजा करणारी इंडिया बुल्स कंपनी आता शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. रेल्वे लाईनसाठी सुरू झालेल्या कामाकरिता होणाऱ्या सोफियाच्या वाहतुकीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. मात्र, कंपनीने याबाबत काहीच दखल न घेतल्याने पीडित शेतकऱ्यांनी गुरुवारी नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सोफिया ऊर्जा प्रकल्पासाठी रेल्वे लाईनचे काम सध्या युध्दस्तरावर सुरू आहे. वलगाव, टाकळी, नांदुरा, खानापूर, कठोरा येथील शेतकऱ्यांच्या शेतामधून रेल्वेमार्ग गेला आहे. या रेल्वे मार्गाची जमीन सोफिया कंपनीने अधिग्रहीत केली. मात्र आजूबाजूची शेती सोफियाच्या भरधाव मालवाहू वाहनांच्या धुळीमुळे नष्ट होत आहे. धूळ बसलेल्या पिकांची वाढ होत नाही. पर्यायाने ती कोमेजून जात आहे. नैसर्गिक आपत्तीत आधीच शेतकरी हवालदील झाला आहे. त्यात सोफियाची ही मनमानी त्यांच्या तोंडाजवळ आलेला घास हिरावून घेत आहे.
टाकळी व नांदुरा परिसरातील मौजे खानापूर शेतसर्वे ५७/४, ५७/१, ५८/२, ५२/२, ६१/२, १०१/२, ११६/२, असे शेतशिवारातील पीडित शेतकऱ्यांची शेती आहे. शेतीजवळूनच विनापरवानगी सोफियाने कच्चा रस्ता काढला. शेतीतून रस्ता असल्याने कोणतीही वाहतूक झाली तरी केवळ धूळच उडते व ती शेतमालावर येऊन बसते. जीवाचे रान करुन शेतीत सोने पिकवले आणि या सोन्यावर सोफियाने घाण करुन टाकली आहे. पर्यायाने तोंडाजवळ आलेले पीक उद्ध्दस्त होत असल्याचे पाहूनही दखल न घेतल्यामुळे अन्यायग्रस्त शेतकरी रामराव सोनवणे, किशोर आवारे, मारोतराव तायडे, संजय काटे, अविनाश वाळेकर, अनिल सावरकर, रामकृष्ण श्रावण हाडोळे, संजय राऊत, गजानन बोबडे, रघुनाथ सावरकर आदींनी नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठून सोफिया कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार केली आहे. (वार्ताहर)