शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीतील ऐतिहासिक खापर्डे वाड्याचे जतन करा

By admin | Updated: May 21, 2015 00:26 IST

येथील राजकमल चौकातील स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रख्यात वकील श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या ऐतिहासिक खापर्डे ....

मागणी : गजानन महाराजांचाही होता मुक्कामअमरावती : येथील राजकमल चौकातील स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रख्यात वकील श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या ऐतिहासिक खापर्डे वाड्याचे महापालिकेने जतन करावे, अशी मागणी संत गजानन महाराज यांच्या भक्तांकडून जोर धरू लागली आहे. संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुणीत झालेली ही एक आध्यात्मिक वास्तू असून येथून अनेक क्रांतिकारक चळवळी चालविल्या गेल्या. त्यामुळे अंबानगरीचे वैभव असलेल्या या वाड्याची दखल अंबानगरीत गुरुवारी दौऱ्यावर येत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक मंत्र्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा भाविक, नागरिकांची आहे. श्रीमंत दादासाहेब खापर्डे हयात असताना संत गजानन महाराजांनी या वाड्यात तीन दिवस वास्तव्य केले होते. ते येथील औदुंबराच्या झाडाखाली व विहिरीजवळ बसायचे. काही काळ त्यांनी तेथे विश्रांती घेतली होती, असा उल्लेख दासगणू महाराजांच्या पोथीतही आहे. 'लोकमत'ने या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व लोकदरबारात मांडल्यानंतर येथे भक्तांचा आजता गुरुवारी राबता असतो. या ऐतिहासिक औदुंबराच्या झाडाचे दर्शन घेण्यासाठी प्रकट दिनाला मोठी गर्दी झाली होती. रामनवमी, हनुमान जयंतीलाही येथे महाप्रसादाचे आयोजन भाविकांतर्फे करण्यात आले होते. यावर्षी ऐतिहासिक गुढीही येथे उभारण्यात आली. दर गुरुवारी येथे भाविक स्वयंस्फूर्तीने येऊन आरती करतात. दादासाहेब खापर्डे यांच्या वशंजांनी ही वास्तू एका खासगी व्यापाऱ्याला काही वर्षांपूर्वी विकल्याचे कळते. परंतु या ऐतिहासिक वाड्याचे जतन त्या खासगी व्यापाऱ्याने केले नाही. वाड्याची अतिशय दूरवस्था आहे. ज्या औदुंबराच्या झाडाखाली संत गजानन महाराजांनी विश्रांती घेतली होती, ते झाड डौलाने आजही उभे आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले जाईल. (प्रतिनिधी)भगतसिंग, टिळक, आंबेडकर...या वाड्याला मोठा इतिहास असून लोकमान्य टिळक, अरविंद घोष, वीर वामनराव जोशी, सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग, राजगुरू, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आदींनी येथे भेटी दिल्या. हे वैभव भावी पिढीतही कायम रहावे, या उद्देशाने ही ऐतिहासिक वास्तू महापालिकेने ताब्यात घेऊन याचे संवर्धन करावे, अशी अपेक्षा नागरिकांचीही आहे.