शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीनंतर पावसाची दडी

By admin | Updated: June 29, 2015 00:40 IST

जिल्ह्यात १२ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. नंतर पाच दिवसांनी मान्सूनचा नियमित पाऊस पडला.

शेतकरी चिंतेत : आठवडा कोरडा गेला, ७५ टक्के पेरणी बाकीअमरावती : जिल्ह्यात १२ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. नंतर पाच दिवसांनी मान्सूनचा नियमित पाऊस पडला. त्यामुळे खरिपाच्या पेरणीला वेग आला. परंतु २२ जूननंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २५ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. दोन दिवसांत पाऊ स न आल्यास निम्म्या पेरणीक्षेत्रात मोड येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीला १५ जूनपासून सुरुवात झाली. नंतर आठवडाभर सतत सार्वत्रिक पाऊस झाला. खरिपाच्या पेरणीला आवश्यक ६५ ते ७० मि.मी. पाऊस झाला असल्याने खरिपाच्या पेरणीला वेग आला. जिल्ह्यात ७ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी दीड लाख हेक्टर क्षेत्रात सद्यस्थितीत पेरणी आटोपली आहे. यापैकी १ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रात कपाशी व सोयाबीनची पेरणी झालेली आहे. मात्र २२ जूनपासून अद्यापपर्यंत पावसाने दांडी मारली आहे. संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या क्षेत्रात स्प्रिंक्लर सुरु झाले आहेत. मात्र कोरडवाहू क्षेत्रात बिजांकुर करपण्याच्या स्थितीत आहे. पेरणी झालेल्या शेतात बियाणे अंकुरण होण्यास ओलाव्याची कमी भासत आहे. अशीच स्थिती दोन दिवस राहिल्यास कोरडवाहू क्षेत्रात झालेल्या पेरणीत किमान २ टक्के शेतात मोड येण्याची भीती निर्माण झाली आहे. तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरू आहे. मागील वर्षी दीड महिना उशिरा पाऊस आल्यामुळे पीक उद्ध्वस्त झाले. यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षीच्या तुलनेत चारपट म्हणजे १९५ मि.मी. पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु २२ तारखेपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. चार दिवसांपासून पाऊ स निरंक२४ जून रोजी चिखलदरा, मोर्शी व वरुड तालुक्यात ५ ते ७ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यानंतर २८ तारखेपर्यंत जिल्ह्यात कुठेही पाऊ स पडला नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तीन दिवसांत तुरळक, नंतर आठवडा कोरडा जिल्ह्यात आठ दिवसांत काही तालुक्यात तुरळक पाऊ स पडला. २८ ते ३० जूनदरम्यान काही ठिकाणी आणखी तुरळक पाऊ स पडण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर पुुढील आठ दिवस (५ जुलैपर्यंत) पुन्हा कोरडा राहण्याची शक्यता श्री शिवाजी कृ षी महाविद्यालयाचे हवामन तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.