शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

ग्रामीण ठाणेदारांना बदलीचे वेध  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 8:37 PM

काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पदभार सांभाळला असून, मुख्यालयी व मलईचे ठाणे न मिळालेल्या काही पोलीस निरीक्षकांना चांगल्या ठाण्यात बदलीचे डोहाळे लागले आहे.

- चेतन घोगरे अमरावती - काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पदभार सांभाळला असून, मुख्यालयी व मलईचे ठाणे न मिळालेल्या काही पोलीस निरीक्षकांना चांगल्या ठाण्यात बदलीचे डोहाळे लागले आहे. त्यामुळे पोलीस वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे.मागील काही दिवसांपासून अमरावती ग्रामीण विभागात राज्यातून बदली करून आलेल्या पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकपदांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यापैकी काहींना अभिनाश कुमार यांच्या कार्यकाळात पोलीस ठाण्यात ठाणेदारपदाचा कार्यभार मिळाला, तर काही अधिकारी अमरावती ग्रामीण मुख्यालय दैनंदिन कामकाज पाहत होते. पण नवे पोलीस अधीक्षक येताच मुख्यालयी असलेल्या पोलीस निरीक्षकांकडून जिल्ह्यातील चांगल्या मलईचे पोलीस ठाणे मिळावे, यासाठी उत्सुक अधिकारी सरसावले आहेत. म्हणून संबंधित पोलीस खात्यातील वरिष्ठ 'गॉडफादर'कडून लॉबिंग लावण्यात येत असल्याचे चित्र आहे. बदलीच्या यादीत वरुड, दतापूर धामणगाव रेल्वे, कुºहा, धारणी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, माहुली जहागीर व वाहतूक शाखेचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. ठाणेदार बदलीबाबत व इतर चर्चेविषयी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातून माहिती घेतली असता कुणीही वरिष्ठ अधिकारी याबाबत स्पष्ट बोली शकले नाही.अतिसंवेदनशील गावांसाठी नवीन ठाणेदार नवखे  काही दिवसांवर गणपती, दुर्गा उत्सव हे येत असून, जिल्ह्यातील काही शहरे व गावे अति संवेदनशील या संवेदनशील आहेत. यामध्ये जुन्या ठाणेदारांची बदली होणे हे शक्य नसल्याचेसुद्धा बोलले जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAmravatiअमरावती