शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील संत्रा बागायतदार वाऱ्यावर

By admin | Updated: June 17, 2014 23:58 IST

गेल्या दोन दशकात संत्र्याच्या लागवडी क्षेत्रात बेसुमार वाढ झाली. मात्र त्या प्रमाणात उत्पादनात आणि दर्जात पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही. अनेकांना संत्र्याच्या बागा नष्ट करण्याशिवाय पर्याय राहीला

सुरेश सवळे - चांदूरबाजार
गेल्या दोन दशकात संत्र्याच्या लागवडी क्षेत्रात बेसुमार वाढ झाली. मात्र त्या प्रमाणात उत्पादनात आणि दर्जात पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही. अनेकांना संत्र्याच्या बागा नष्ट करण्याशिवाय पर्याय राहीला नाही. नागपुरी संत्रा अशी सर्वदूर ख्याती असणाऱ्या संत्रा बागाची व बागायतदारांची आजची ही दारूण अवस्था आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि वरूड दरम्यान १८ एकर क्षेत्रात एक विशाल सरकारी संत्रा नर्सरी आहे. या नर्सरीतून चांगल्या व जातीवंत संत्रा कळ्या पुरविण्यात येतात. पण अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्र, मार्गदर्शन व्यवस्था उभारण्याचे आजवर कोणालाच सुचले नाही. संत्रा लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असतांना संत्र्याचे उत्पादन व दर्जा वाढत नाही.
सरकारी नोंदणीनुसार विदर्भात सुमारे १ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून त्यापैकी निम्मे क्षेत्र म्हणजे सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात आहे. पुर्वी वडद, मोर्शी, काटोल, कळमेश्वर याच भागात मर्यादीत असणाऱ्या संत्रा बागा गेल्या तीन-चार दशकात विदर्भातील बहुतेक सर्वच जिल्ह्यात विस्तारल्या आहेत. विदर्भातील सुमारे पाच लाख टन संत्रा उत्पादनापैकी जवळपास अडीच लाख टन संत्रा उत्पादन एकट्या अमरावती जिल्ह्यातून व्हावे हे त्याचेच प्रमाण आहे. पण या संत्र्याची गुणवत्ता व दर्जा नसल्याने तसेच प्रत्येक संत्रा झाडाला फळधारणा क्षमता रोडावल्याने एकूण उत्पादनापैकी किमान ५० टक्क्यापेक्षा अधिक संत्रा आवश्यक निकषात बसत नसल्याने तो कमी भावात विकणे भाग पडते. लहान आकारचा व दर्जा नसणाऱ्या अशा संत्रा उत्पादनासाठी विदर्भात कोल्ड स्टोरेजची सोय नसणे, संत्रा प्रक्रिया प्रकल्प नसणे ही सुध्दा मोठी समस्या आहे. झाडावरून संत्रा उतरविल्यानंतर चार दिवसात त्याची विल्हेवाट लागणे आवश्यक असते. अन्यथा तो सडण्याच्या मार्गी लागतो.
आंबिया व मृग असे संत्र्याचे दोन बहार असले तरी अमरावती जिल्ह्यात व विदर्भातही आंबियाचे उत्पादन जास्तच असते. यंदाही मृग बहाराचे उत्पादन पाच टक्केच आहे. पण आंबिया बहार चांगला असून त्याला २२०० ते २५०० प्रती हजार किंवा २२ हजार रूपये प्रती टन भाव दिला जात आहे. संत्रा पीक झाडावर असतांना संत्र्याचा बहार पाहूनच खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. सध्याचे हवामान, पाऊस, पाणी, वातावरण चांगले राहिल्यास आॅगस्ट-सप्टेंबर नंतर आंबिया मोठ्या प्रमाणात बाजारात येईल.
त्यानंतर भाव कमी-जास्त होण्याची शक्यता व्यापारी वर्गात वर्तविण्यात येत आहे. मृग बहाराचे उत्पादनच नसल्याने त्याचे भाव वाढूनही बागायतदारांना त्याचा फायदा होणार नाही. शिवाय आंबिया बहारालाही अतिवृष्टी व हवामानाचा फटका बसला तर बम्पड क्रॉप सुध्दा गमवावे लागेल अशी आजची अवस्था आहे.
आंबिया संत्रा सोबतच पंजाब प्रांतातून किन्नू नावाने येणारा संत्रा दक्षिणेतील बाजारात स्पर्धेत असते. पंजाब सरकारने या संत्र्याला मोठ्या प्रमाणात सोयी-सवलती दिल्याने तसेच दर्जा, गुणवत्ता, आकारमान यासाठी विशेष व्यवस्था केल्याने नागपुरीसंत्र्यापेक्षा किन्नू बाजारात भाव खात जातो.
व्हॅक्सीनेशन आणि कोल्ड स्टोरेज मधील साठवणूक यामुळे किन्नू फळे अधिक चमकदार, रसदार आणि हवामानाच्या धोक्यातही कायम राहतात.
संत्रा पिकाचा खालावलेला दर्जा, गुणवत्ता आणि आकारमानामुळे सुमारे सात वर्षापूर्वी दिल्ली परिसरातून आलेला संत्रा व्यापारी आता या भागातून परागंदा झाले आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी संत्रा बागा, शेत विकत घेऊन या भागात उभारल्या होत्या. फक्त बहार विकत घेण्याएवजी अनेकांनी जमिनी खरेदी करून संत्रा पिक नगण्य भावात स्थानिक बाजारातच विकणे भाग पडू लागल्याने त्यांनी येथून काढता पाय घेतला. सध्या संत्रा व्यापारात त्यामुळेच केवळ स्थानिक व्यापारी उरले आहेत. हंगाम आला की परप्रांतिय व्यापारी येतात, धंदा करतात व निघून जातात अशीच परिस्थिती सध्या संत्र्याच्या हंगामात सुरू आहे.