शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हाधिकाऱ्यांना संत्री, सोयाबीन कुटार भेट

By admin | Updated: November 1, 2014 22:45 IST

चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यात संत्रा, सोयाबीन, कपाशी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार

अमरावती : चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यात संत्रा, सोयाबीन, कपाशी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, याकरिता शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांना सोयाबीन कुटार व संत्री भेट देऊन तीव्र भावना शासनापर्यंत पोहचविण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे.अचलपूर मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांमध्ये सोयाबीन, कपाशी, संत्रा पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. परंतु यंदा अपुरा पाऊस तसेच गारपीट व अवकाळी पाऊसामुळे वरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर मोठा आघात झाल्यामुळे या परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावण्यासाठी राज्य शासनाने तातडीने हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, अशी मागणी प्रहार पक्षातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांच्याकडे केली आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे नापिकीमुळे झालेले नुकसान दाखविण्यासाठी प्रहार कार्यकर्त्यांनी यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांना सोयाबीनचे कुटार व संत्र्याचे झालेले नुकसान दाखवून आपला संताप शासनापर्यंत पोहविण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रहारचे मंगेश देशमुख, राजेश वाटाणे, सुरेश गणेशकर, बाळासाहेब वाकोडे, राजेश सोलव, भाष्कर सांयदे शिवा भुयार, अजय तायडे, गजानन ठाकरे, एकनाथ अवसरमोल, संतोष किटुकले, भगवंत दामेधर, संजय झिंगरे, अजय राऊत, सुरेश भेंडे, सतीश राऊत, अरूण गणथडे, याशिम कुरेशी, नामदेव सावरकर व अन्य आर्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)