शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

बडनेर्‍यातील मजीप्राच्या कार्यालयाला कुलूप ठोकले

By admin | Updated: May 17, 2014 23:14 IST

सलग ७ दिवसांपासून नवीवस्ती परिसरात पाण्याचा एक थेंबही न मिळल्यामुळे या परिसरातील महिलांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाला शनिवारी कुलूप ठोकून संताप व्यक्त केला.

बडनेरा : सलग ७ दिवसांपासून नवीवस्ती परिसरात पाण्याचा एक थेंबही न मिळल्यामुळे या परिसरातील महिलांनी  जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाला शनिवारी कुलूप ठोकून संताप व्यक्त केला. पाण्याचा पुरवठा तत्काळ सुरळीत न  झाल्यास उपविभागीय अभियंता सोनार यांच्या कार्यालयात ठिय्या देण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला.
बडनेर्‍यात दोन टाक्यांमार्फत पाणीपुरवठा केला जातो. एक जुन्या वस्तीत तर दुसरी नव्या वस्तीत  पाण्याची टाकी  होती. जुन्यावस्तीतील पाण्याच्या टाकीचे डोम कोसळल्याने या टाकीतून जुन्या वस्तीचा पाणीपुरवठा बंद करण्यात  आला. ही टाकी भुईसपाट करण्याचे काम सुरु आहे. याच ठिकाणी नवीन टाकी उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे  धूळखात आहे. मागील वर्षभरापासून बडनेर्‍यातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.  प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे बडनेरावासीयांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. 
१२ मे २0१४ पासून बडनेर्‍यात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. नव्या वस्तीच्या टाकीतून संपूर्ण बडेनरा  शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठय़ाच्या वाढत्या मागणीमुळे जीवन प्राधीकरणाला एकाच टाकीतून  पाण्याचा पुरवठा करणे शक्य होत नसल्यामुळे एक दिवस जुन्यावस्तीत तर एक दिवस नव्या वस्तीत पाण्याचा  पुरवठा केला जात आहे. तोदेखील अनियमित होत असल्यामुळे बर्‍याच भागामध्ये पाणी मिळत नाही. गेल्या सात  दिवसांपासून हमालपुरा, गजानन नगर, झिरी परिसराला पाण्याचा पुरवठा बंद आहे. या ठिकाणच्या पाईप लाईनमध्ये  अडथळा निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. याचाच संताप व्यक्त करीत स्थानिक हमालपुरा परिसरातील  महिलांनी नव्या वस्तीस्थित पाण्याच्या टाकीजवळच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. एसटी डेपोच्या मागील बाजूस  असणार्‍या शारदा नगरामध्ये गेल्या एक महिन्यांपासून पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नाही. त्याचप्रमाणे वडरपुर्‍यात  तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा व्यवस्थित नाही. 
चावडी चौक, ब्राम्हणपुरा, बारीपुरा, पवणनगर, मिलचाळ परिसर, नव्यावस्तीतील माळीपुरा या भागात कमी दाबाचा  पाणीपुरवठा होतो. जीवन प्राधिकरणने याचे नियोजन करुन लवकरात लवकर पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा,  अशी मागणी संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता सोनार यांच्या समोर मांडली. पाणी समस्या  तातडीने निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.   (प्रतिनिधी)