शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न सोडाच; उत्पादन खर्चाचेही वावडे!

By admin | Updated: December 11, 2014 23:00 IST

मागील वर्षी अतिपाऊस, परतीचा पाऊस तसेच गारपिटीमुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. यावर्षी अल्पशा पावसामुळे व निकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन गारद झाले. सलग तीन वर्षांपासून हीच स्थिती आहे.

अमरावती : मागील वर्षी अतिपाऊस, परतीचा पाऊस तसेच गारपिटीमुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. यावर्षी अल्पशा पावसामुळे व निकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन गारद झाले. सलग तीन वर्षांपासून हीच स्थिती आहे. प्रमुख पिकांच्या लागवडीसह फवारणी व काढणीपर्यंतचा अर्धा खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नसल्याचे दुर्दैवी चित्र यावर्षी पहायला मिळत आहे.
मागील दशकापासून जिल्ह्यात सोयाबीनचे पेरणीक्षेत्र वाढले आहे. विशेषत: रोखीचे पीक म्हणून शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले. खरिपाच्या सरासरी लागवड क्षेत्रापेक्षा ५० टक्के क्षेत्रात सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी लागवडक्षेत्र ७ लाख १४ हजार हेक्टर असताना ३ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे; तथापि पेरणीनंतर जून महिन्यापासून दीड महिना पावसाची दडी, त्यानंतर पावसात खंड व निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. मागील दोन, तीन वर्षांचा सोयाबीन पिकाचा ताळेबंद पाहिला असता उत्पादन खर्चाच्या अर्धेदेखील उत्पन्न झालेले नाही.
बँकांचे पीककर्ज, खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी महागड्या बियाण्यांची पेरणी केली होती. पेरणी पाठोपाठ डीएपी खते, तणनाशके, कीटकनाशकांच्या तीन फवारण्या, निंदण, खुरपण, मशागत ते काढणीपर्यंतचा खर्च शेतकऱ्यांनी केला. प्रतिएकर खर्चाच्या तुलनेत सोयाबीनचा उतारा व प्रतीक्विंटल मिळणाऱ्या भावाचा ताळेबंद पाहिल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात यावर्षी लागवडीपासून काढणीपर्यंत झालेला निम्मे खर्चही पदरात पडला नाही. आणेवारीदेखील ४६ पैसेच आहे. म्हणजेच जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. त्यामुळे शेतकरी शासनाकडे मोठ्या आशेने पाहत आहेत.