शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
4
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
5
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
6
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
7
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
8
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
9
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
10
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
13
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
14
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
15
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
16
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
17
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
18
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
19
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
20
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रसादात निघाल्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 23:57 IST

साईनगरातील श्री साईबाबा ट्रस्ट अनेक दिवसांपासून चर्चेत असताना आणखी एक विवादित मुद्दा पुढे आला आहे.

श्री साईबाबा संस्थान : तक्रार वहीत नोंद
अमरावती : साईनगरातील श्री साईबाबा ट्रस्ट अनेक दिवसांपासून चर्चेत असताना आणखी एक विवादित मुद्दा पुढे आला आहे. संस्थाकडून देण्यात आलेल्या शाश्वत अन्नदान प्रसादात अळ्या निघाल्याने भाविकांमध्ये रोष उफाळून आला होता. यासंदर्भात भाविकांनी संस्थेच्याच तक्रार विहित नोंद केली असून भाविक धर्मादाय आयुक्तांकडे सुद्धा तक्रार करणार आहेत.
साईनगरातील श्री साईबाबा ट्रस्टने सार्वजनिक जागेचा व्यावसायिक उपयोग केल्याचे काही महिन्यांपूर्वी उघड झाले. माजी व्यवस्थापक अविनाश ढगे यांच्या तक्रारीवरून साईबाबा ट्रस्टवर कारवाईसुद्धा कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे साईबाबा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. या संस्थानात हजारो भाविक दान करतात. त्यामुळे दानपेटीत लाखो रुपये जमा होतात. तसेच अनेक जण कडधान्यसुद्धा दान स्वरुपात देतात. त्या अनुषंगाने संस्थानकडून दर गुरुवारी शाश्वत अन्नदान केले जाते. भाविकांनी केलेल्या दानातून हे अन्नदान केले जात असून दानदात्या भाविकांना डब्ब्यात पँकिंग करून प्रसाद दिला जातो. दर गुरुवारी साधारणात १३० डब्बे प्रसाद भाविकांना दिला जातो, तसेच १ हजारावर भाविक प्रसादाचा लाभ घेतात. ७ जुलै रोजीच्या गुरुवारी साईनगरातील रहिवासी निर्मलसिंग खालसा यांनी मंदिरात जाऊन प्रसाद घेतला आणि ते घरी गेले. प्रसाद खाण्यापूर्वीच त्यांना भातात पांढऱ्या अळ्या आढळून आल्यात. यापूर्वीही एकदा या प्रसादातील भाजीत खालसा यांना अळ्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेले खालसा यांनी ही बाब संस्थान पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.

पदाधिकाऱ्यांना विचारला जाब
अमरावती : वारवांर घडणाऱ्या हा प्रकार थांबत नसल्याचे पाहून खालसा यांनी अखेर शनिवारी पुन्हा साईबाबा संस्थान गाठून पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. खालसा यांनी संस्थानच्या तक्रार वहीत अन्नदानातील या प्रकाराची नोंद केली असून ते आता धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत. (प्रतिनिधी)ं

साईबाबा मंदिरात आम्ही श्रध्देने जातो. मात्र, संस्थानचे पदाधिकारी भाविकांच्या श्रद्धेचा विचार करीत नाहीत. १५ दिवसांपूर्वी अन्नदानातील वांग्याच्या भाजीत अळ्या निघाल्या. ७ जुलैच्या गुरुवारी भातात अळ्या निघाल्या. यामुळे भाविकांच्या भावनाशी हा खेळच सुरू आहे. यासंदर्भात तक्रारवहीत नोंद केली.
- निर्मलसिंग खालसा,
साईनगर रहिवासी

आम्ही स्वयंपाक करण्याचा कंत्राट दिला आहे. त्यांच्यावर आमची देखरेख असते. मात्र, अनावधानाने ही चूक झाली असावी. धान्य निवडणारे व स्वयंपाक बनविणाऱ्यांची आम्ही चौकशी करू.
- शरद दातेराव, सचिव, श्री साईबाबा संस्थान, साईनगर