शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे क्विंटलऐवजी किलोत उत्पादन

By admin | Updated: October 30, 2014 22:45 IST

पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमित पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे सोयाबीनचे पीक यंदा दिवाळी संपूनही हाती आले नाही.

चांदूरबाजार : पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमित पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे सोयाबीनचे पीक यंदा दिवाळी संपूनही हाती आले नाही. आले ते उत्पादन क्विंटलऐवजी किलोत आहे. त्यामुळे गणोजा, सोनोरी परिसरातील सोयाबीन उत्पादकांनी पीक काढणीचा खर्च तरी वाचेल म्हणून उभे पीकच वखरुन टाकले आहे.तालुक्यात २१ हजारांवर हेक्टरमध्ये सोयाबीनचे पीक होते. त्यात ६० टक्के शेतामधील सोयाबीनचे उत्पादन झाले तर ४० टक्के शेतातील सोयाबीन अज्ञात रोगामुळे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. यावर कळस म्हणजे अत्यल्प प्रमाणात उत्पादन झालेले सोयाबीन कुठे विकायचे, अशी स्थिती आल्याने ते बाजारातून हरपले आहे. कापूस खरेदीचा मुहूर्त नसल्याने शेतकरी पूरता आर्थिक अडचणीत सापडला आहे. यात सुरुवातीला अस्मानी संकटाने समस्या निर्माण केली तर त्यानंतर तीन महिन्यापासून सरकारच अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांचा नेमका वाली कोण? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.एकीकडे खरीप हंगाम हातचा गेला तर दुसरीकडे रबी हंगामाचे नियोजन आर्थिक अडचणींमुळे कोलमडले आहे. चारही बाजंूनी शेतकरी अडचणीत सापडला आहे. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात, दिवाळीच्या मोसमात राज्यात एकाच दिवशी तब्बल सात शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे वास्तव विसरून चालणार नाही. सोयाबीनचे उत्पादन नाही. उत्पादन खर्चाचाही भुर्दंड शेतकऱ्यांवर बसला असताना रोखीचे पीक म्हणून आता शेतकऱ्यांचे भवितव्य कापसावर अवलंबून आहे. कापसाच्या हमी भावातही शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसत आहे. शासनाने यंदा कापसाचा हमीभाव जाहीर करताना क्विंटलमागे ५० रूपयाची वाढ करून शेतकऱ्याविषयीचा कळकळा दाखवून दिला आहे. उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली. खते, तणनाशके, किटकनाशके, मजुरीत प्रचंड वाढ झाली आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च एकरी १२ हजार रूपये आहे, बागायती कपाशी एकरी ३५ हजार तर कोरडवाहू १८ ते २० हजारापर्यंत उत्पादन खर्च येतो. सोयाबीन उच्च प्रतिचा ३ हजार तर कपाशी उच्च प्रतीची ३ हजार ८०० रूपये, कपाशीवरही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काही ठिकाणी कापसाची झाडे उपटून हरभरा पेरण्यात आला. इतकी दयनीय अवस्था सध्या शेतकऱ्यांची झाली आहे. नेते मंडळी दोन महिन्यापासून निवडणुकीत व्यस्त होती तर शेतकरी पिकांचे भविष्य शोधत होता. निवडणुकीत आश्वासनाचा पूर वाहत असला तरी शेतकरी मात्र पावसाच्या एका थेंबासाठी तडफडत होता. आता तर रबी पिकासाठी जमिनीत ओलावा नाही, ही नवीन समस्या आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)