शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण होणार मनोरंजक

By admin | Updated: May 9, 2014 01:00 IST

शालेय शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासोबतच पाठय़पुस्तकातील धडे लगेचच अवगत होण्याच्या दृष्टिकोनातून शालेय अभ्यासक्रमातील पहिली ते आठवीपर्यंतची सर्व पुस्तके..

ई-बुक्समध्ये रूपांतर
अमरावती : शालेय शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासोबतच पाठय़पुस्तकातील धडे लगेचच अवगत होण्याच्या दृष्टिकोनातून शालेय अभ्यासक्रमातील पहिली ते आठवीपर्यंतची सर्व पुस्तके ईबुक्स स्वरूपात प्रकाशित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य पाठपुस्तक संशोधन आणि निर्मिती मंडळाच्या बालभारतीच्या अभ्यासक्रमात यावर्षी ई-तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याने पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मनोरंजक होणार आहे.
सध्या आरटीई व आरटीआय या नियमांची अंमलबजावणी शिक्षण विभागात चालू आहे.या अंतर्गत शिक्षकांना विविध प्रकारची प्रकाशने देण्यात येत आहेत. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी ई स्कूलची निर्मिती करण्यात आली.काही जिल्ह्यांतील काही शाळांमध्ये ई स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात आहे. यापूर्वी विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या उपक्रमातील मिळालेली फलश्रृती लक्षात घेता शालेय शिक्षण विभाग व शासनाने पहिली ते आठवीपर्यंतची सर्व पुस्तके ई बुक्स स्वरूपात तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार झालेल्या पाठय़पुस्तकांचे रूपांतर ई बुक्समध्ये केले जात आहे.पाठय़पुस्तकातील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अवगत व्हावे यासाठी पाठांना पूरक असे ध्वनीचित्रफिती देण्यात आले आहे.पुस्तकातील कथा अँनिमेशनमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढावी, शिक्षण रंजक संवादात्मक आणि मनोरंजक व्हावे तसेच शिक्षणामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढावा हा या उपक्रमाचा हेतू आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविला जाणार आहे.(प्रतिनिधी)