शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यात शासकीय रक्तपेढीने १०३ बॉटल दूषित रक्त केले नष्ट 

By उज्वल भालेकर | Updated: July 17, 2024 19:54 IST

एचआयव्ही, हिपॅटायटीस बी, सी रुग्णांनी केले होते रक्तदान

अमरावती: रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे आहे; परंतु रुग्णांना रक्त चढविण्यापूर्वी रक्त सुरक्षित आहे का, याची चाचणी केली जाते. जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीमध्ये सहा महिन्यांमध्ये ४ हजार ४०९ जणांनी रक्तदान केले. यामध्ये १०३ रक्तदात्यांचे रक्त हे दूषित आढळून आले आहे. यामध्ये ९ जणांना एचआयव्ही असल्याचे आढळून आले आहे. या सर्व दूषित रक्ताची वेळीच विल्हेवाट लावून ते नष्टदेखील करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात वर्षभरात हजारो गरजू रुग्णांना रक्ताची गरज पडते. यामध्ये अपघातग्रस्त, गर्भवती महिला, सिकलसेल, थॅलेसेमिया, तसेच इतरही अनेक गरजू रुग्णांना रक्त आवश्यक असते. त्यामुळे रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात शासकीय रक्तपेढीबरोबरच काही खासगी रक्तपेढ्याही कार्यरत आहेत. इर्विन रुग्णालयातील रक्तपेढी ही जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी आहे. या रक्तपेढीमधून जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये रक्तपुरवठा केला जातो. त्यामुळे या ठिकाणी रक्तदान केल्यानंतर ते रक्त सुरक्षित आहे का, याची चाचणी केली जाते आणि त्यानंतर सुरक्षित रक्त संबंधित रुग्णांना चढविले जाते. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये इर्विन रक्तपेढीमध्ये ४ हजार ४०९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात १०३ पिशव्या रक्त हे दूषित आढळून आले आहे.

या आजाराचे आहे दूषित रक्तशासकीय रक्तपेढीमध्ये सहा महिन्यांत संकलित झालेल्या रक्ताच्या चाचणीमध्ये ०९ रक्तदात्यांचे रक्त हे एचआयव्ही पॉझिटिव्ह, १५ पिशव्या रक्त हे हिपॅटायटिस-बी, तर ७९ पिशव्या रक्त हे हिपॅटायटिस- सी विषाणू दूषित आढळून आले.

रक्तदान करताना घ्या काळजी?रक्तदान करण्यापूर्वी रक्तदाता हा निरोगी आहे की नाही याची तपासणी करणे गरजेचे आहे. रक्तदाता जर रक्तदान करण्यापूर्वी काही दिवस आजारी असेल तर त्याने रक्तदान करणे टाळावे. रक्तदान केल्यानंतरही ते रक्त सुरक्षित आहे की नाही याची चाचणी करूनच संबंधित रुग्णांना द्यावे.इर्विन येथे रक्त संकलित केल्यानंतर त्या रक्ताचे एचआयव्ही, मलेरिया, गुप्तरोग, हिपॅटायटिस-बी व सी या विषाणूंची चाचणी केली जाते. यामध्ये जे रक्त दूषित आढळले त्याची योग्य विल्हेवाट लावून सुरक्षित रक्तच रुग्णांना दिले जाते. सहा महिन्यांत १०३ बॉटल रक्त दूषित आढळले. - डॉ. आशिष वाघमारे, रक्तपेढी प्रमुख, इर्विन

टॅग्स :AmravatiअमरावतीBlood Bankरक्तपेढी