शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे- शेखर भोयर

By admin | Updated: June 17, 2014 23:57 IST

आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासनाने शिक्षणाचा अधिकार दिला आहे. परंतु शिक्षकांच्या अधिकाराची लढाई अद्याप अपूूर्ण आहे. निवडून आल्यास ती लढाई पूर्ण करायची आहे. त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त

अमरावती : आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासनाने शिक्षणाचा अधिकार दिला आहे. परंतु शिक्षकांच्या अधिकाराची लढाई अद्याप अपूूर्ण आहे. निवडून आल्यास ती लढाई पूर्ण करायची आहे. त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांचे पर्ू्ण शिक्षण मोफत करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही शेखर भोयर यांनी दिली. यवतमाळ येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
शिक्षकांनी कौल दिल्यास निवडून आल्यानंतर समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी गणवेश योजना लागू केली जाईल. इतकेच नव्हे तर शिक्षकांच्या संदर्भातील सर्व नियम, योजना सवलती, वेतन व वेतनेतर माहितीही उपलब्ध करून देणार, असा संकल्प यावेळी शेखर भोयर यांनी व्यक्त केला. विदर्भातील शेतकऱ्यांवर कर्जामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान पॅकेजच्या माध्यमातून शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. विधानपरिषदेत नेतृत्व करण्याची संंधी मिळाल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांचे सर्व शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू करून मोफत केले जाईल, असेही यावेळी भोयर यांनी सांगितले.
याशिवाय शालेय गणवेशाच्या योजना सर्व घटकांतील विद्यार्थ्यांसाठी लागू करून कोणालाही या योजनेपासून वंचित न ठेवण्याचा संकल्प यावेळी भोयर यांनी केला. शिक्षक अद्ययावत झाल्यास त्याचे अध्यापन सुध्दा प्रभावी होईल. याकरिता प्रत्येक शिक्षकाला लॅपटॉप खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज देण्याची तरतूद करण्याचा मानस यावेळी भोयर यांनी व्यक्त केला. इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षक व शाळेसंदर्भातील प्रत्येक अद्ययावत माहिती शिक्षकांच्या हाती उपलब्ध करून दिली जाईल, असेही शेखर भोयर यांनी सांगितले. अद्याप शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. संधी मिळाल्यास शिक्षकांचे सक्षमपणे नेतृत्व करून या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास यावेळी शेखर भोेयर यांनी शिक्षकांना दिला.