शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

कर्जमुक्तीसाठी वऱ्हाडात हवे पाच हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 2:55 PM

पश्चिम विदर्भात कर्जमाफी योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत थकबाकीदार असलेले ७ लाख १३ हजार ६०९ शेतकरी निष्पन्न झालेत.

गजानन मोहोड

अमरावती -  पश्चिम विदर्भात कर्जमाफी योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत थकबाकीदार असलेले ७ लाख १३ हजार ६०९ शेतकरी निष्पन्न झालेत. त्यांच्याकडे ४९७० कोटी ९६ लाख ८२ हजार रुपयांची थकबाकी आहे. मात्र, यापैकी १४ हजार ८३३ शेतकऱ्यांनी अद्याप बँक खाते आधार लिंक केलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कर्जमुक्तीमध्ये बाधा येणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले आणि १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदती पीककर्ज आणि पीक पुनर्गठित कर्ज माफ होणार आहे. कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत बँक अधिकाऱ्यांद्वारा १ ते २८ रकान्यांच्या प्रपत्रात शेतकऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या महिन्याच्या अखेरीस यासाठी शासनाचे पोर्टल सुरू होणार आहे. यामध्ये एकदा पोर्टलवर माहिती 'अपलोड' झाल्यावर त्यात बँकास्तरावर बदल करता येणार नाही. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक व बँक खात्याचा तपशील आदी माहिती अचूक पोर्टलवर नोंदविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी यापूर्वीच दिले आहे.

या कर्जमुक्ती योजनेसाठी ५ लाख ६२ हजार २९७ शेतकऱ्यांनी बँक खाते आधार संलग्न केले आहे. बुधवारी १ लाख ३५ हजार ८२५ शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केली असली तरी अद्यापही १४ हजार ८३३ शेतकऱ्यांनी आधार बँक खात्याशी लिंक केलेले नाहीत. यासर्व शेतकऱ्यांची यादी सोसायटी, बँकास्तरावर लावल्याची माहिती सहकार विभागाने दिली.

 पश्चिम विदर्भाची सद्यस्थिती (लाखांत)

जिल्हा            खातेदार           थकबाकी        आधार बाकीअमरावती      १५११७५          ११७७३३.००        ४०९४अकोला         ११३८४९           ७७५८४.४३        १७८२यवतमाळ      १३७९१५          ८३३१२.६३         ५२४७बुलडाणा       २००९४०          १४०७४४.००       २६०४वाशीम          १०९७३०          ७७७२२.२६        ११०६एकूण            ७१३६०९         ४९७०९६.००       १४८३३

योजनेच्या लाभासाठी १ ते २८ कॉलममध्ये माहिती भरण्यात येत आहे. १ तारखेला पोर्टल सुरू झाल्यावर योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांची माहिती त्यात भरली जाईल.

- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक, अमरावती 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAmravatiअमरावती