शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अखेर बडनेऱ्यात रेल्वे पार्सल सुविधा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 5:00 AM

आर्थिक उत्पन्नात माघारल्याच्या कारणास्तव बडनेरा रेल्वे स्थानकावरील बंद केलेले पार्सल कार्यालय शनिवारपासून पुन्हा सुरू झाले आहे. पार्सलमधून मिळणारे उत्पन्न तीन महिन्यांपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर तपासले जातील. त्यानंतर रेल्वे प्रशासन हे पार्सल सुविधा सुरू ठेवावी अथवा नाही? यावर निर्णय घेणार आहे. त्याअनुषंगाने मुंबई मध्य रेल्वे विभागाच्या महाप्रबंधकांनी ८ नोव्हेंबर रोजी अधिसूचना काढली.

ठळक मुद्देरेल्वेच्या अधिसूचना : प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांचे आर्थिक उत्पन्न तपासणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आर्थिक उत्पन्नात माघारल्याच्या कारणास्तव बडनेरा रेल्वे स्थानकावरील बंद केलेले पार्सल कार्यालय शनिवारपासून पुन्हा सुरू झाले आहे. पार्सलमधून मिळणारे उत्पन्न तीन महिन्यांपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर तपासले जातील. त्यानंतर रेल्वे प्रशासन हे पार्सल सुविधा सुरू ठेवावी अथवा नाही? यावर निर्णय घेणार आहे. त्याअनुषंगाने मुंबई मध्य रेल्वे विभागाच्या महाप्रबंधकांनी ८ नोव्हेंबर रोजी अधिसूचना काढली.बडनेरा रेल्वे स्थानक अस्तित्वात आले तेव्हापासून येथे पार्सल कार्यालय होते. मात्र, उत्पन्न घटल्यामुळे बडनेºयातील रेल्वे पार्सल बंद करण्यात आले. त्यामुळे व्यापारी, उद्योजक, लघु व्यावसायिकांना मालाची ने-आण करण कठीण झाले. मध्यंतरी व्यावसायिकांनी खासदार नवनीत राणा यांची भेट घेत बडनेऱ्यातील पार्सल कार्यालय सुरू करण्याबाबत साकडे घातले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी मुंबईत रेल्वेच्या महाप्रबधकांना पत्र पाठवून पुन्हा पार्सल कार्यालय सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नुकतेच मुंबई मुख्यालयाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक आलोक मिश्रा यांनी बडनेरा व अमरावती रेल्वे स्थानकावरील पार्सल उत्पन्नाचा आढावा घेतला. मिश्रा यांनी काही व्यापारी, उद्योजक, नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. दरम्यान व्यावसायिकांनी बडनेरा परिसरातून शेतीमाल मुंबई, पुणेकडे पाठविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर आलोक मिश्रा यांनी या भेटीचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. त्यानुसार मुंबई मध्य रेल्वे विभागाचे मुख्य वाणिज्य प्रबंधक (मालभाडे सेवा) व्ही.पी. दाहाट यांनी बडनेरा रेल्वे स्थानकावरील बंद करण्यात आलेले पार्सल कार्यालय सुरू करण्याबाबत अधिसूचना काढली आहे.बडनेरा रेल्वे स्थानकावरील बंद झालेले पार्सल कार्यालय सुरु केल्यास शेतकरी, व्यापाऱ्यांना माल बाहेरगावी पाठविणे सुकर होईल. त्याअनुषंगानेच मुंबई मध्य रेल्वे विभागाच्या महाप्रबंधकांना पत्र पाठविले. आता याचा लाभ घेत रेल्वेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.- नवनीत रवि राणाखासदार, अमरावती

टॅग्स :railwayरेल्वे