शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संकटात, भरपाईची मागणी

By admin | Updated: February 12, 2015 00:18 IST

मंगळवारी रात्रीला आलेल्या वादळासह अवकाळी पावसाने रबीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. संत्र्याच्या आंबिया व मृग बहाराची फळे गळली.

अमरावती : मंगळवारी रात्रीला आलेल्या वादळासह अवकाळी पावसाने रबीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. संत्र्याच्या आंबिया व मृग बहाराची फळे गळली. नांदगाव तालुक्यात काही ठिकाणी हरभऱ्याच्या आकाराची गारपीट झाली. अंजनगाव, पथ्रोट परिसरात केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याची मागणी जोर धरत आहे. शेतकऱ्यांवर वारंवार नैसर्गिक आपत्तीचा मार बसत असल्याने जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नांदगाव तालुक्यात गारांसह पाऊस
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात रात्री १ वाजताच्या सुमारास वादळी पावसासह बोराच्या आकाराच्या गारा पडल्याने संत्रा गहू, हरभरा, तूर, आंबा या पिकाचे नुकसान झाले. खंडाळा, पळसमंडळ, हंसराजपूर परिसरात वादळी पावसाचा तडाखा बसला. तुरीच्या गंज्याही भिजल्या. तालुक्यात ८८४ हेक्टर संत्रात संत्रा, ९७ हेक्टरमध्ये लिंबू व ४२०० हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी झाली. बुधवारी पळसमंडळचे सरपंच महेंद्र शेंडे, उपसरपंच नरेश ठाकरे, सर्फराज खान, नशीब खान, राजकुमार ठाकरे, भैया रोडे, किशोर ठाकरे, रणजित खडसे यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी केली.