शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी शेतकऱ्यांना हवा शासनाचा आधार

By admin | Updated: May 12, 2015 00:09 IST

सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. परिणामी ते पीक कर्जाची परतफेड करु शकले ...

अपेक्षा : विविध उपाययोजनांसह बी-बियाणे, खते, कर्जपुरवठा कराअमरावती : सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. परिणामी ते पीक कर्जाची परतफेड करु शकले नाहीत. यंदाही सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे बँका नातेवाईक मित्र आणि सावकारही पिकाच्या भरवशावर शेतकऱ्यांना कर्ज व आर्थिक मदतीसाठी तयार नाहीत. अशा बिकट परिस्थितीत शासनानेच शेतकऱ्यांना बी-बियाणे व खते उपलब्ध करुन द्यावीत. विनाअट बँकांना पीककर्ज देण्याचे आदेश जारी करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक परिस्थिती पूर्णत: ढासळली आहे. कर्जाचा डोंगर वाढला आहे. २०१२ मध्ये घेतलेले पीककर्ज फेडता आले नाही. २०१५ मध्ये गारपीट व अवकाळी पाऊस पडला. २०१४ मध्ये सरासरी ३० ते ४८ टक्के पर्जन्यमान कमी झाले. यावर्षी सरासरीपेक्षा २८ टक्के पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. पंचायत समिती वग्रामपंचायत घेणार ठरावसध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे या परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी अंजनगाव पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हिरापूर येथे येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व विनाअट कर्जपुरवठा आणि आवश्यक उपाययोजना शासनाने करावा याबाबत ठराव घेऊन तो शासनाला पाठविला जाणार आहे. (प्रतिनिधी)शासनाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षासंपूर्ण पीककर्ज व वीज बिल माफ करावे, शेतीला नियमित वीज दिली जावी. शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करुन द्यावे, पीक पद्धतीत बदल्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, कमीत कमी पाण्यात येणारे व अधिक उत्पादन देणारे वाण शेतकऱ्यांना दिले जावे, शेडनेट पॉलीहाऊस सिंचनाचा वापर वाढण्याचे टार्गेट कृषी विभागाला दिले जावे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी. महागाई निर्देशांकानुसार शेतकरी कुटुंबाला मदत मिळावी, ग्रामीण भागात रोजगारांच्या संधी द्याव्यात, नदी-नाले, डोंगर पोखरण्यास निर्बंध घालावे. कृषी विभागात कृषी शास्त्रज्ञ कर्मचाऱ्यांची बांधावर जाऊन शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. कोरडवाहू शेतीसाठी विशेष धोरण राबवावे, लोकसहभागातून सर्वस्तरावर जलपुनर्भरणाची कामे सुरू करावीत.