शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: July 10, 2016 00:06 IST

केंद्र शासनाने सातवा वेतन आयोग नुकताच घोषित केला.

आरोप : जिल्हा महिला काँग्रेस कमिटीचे निवेदन
तिवसा: केंद्र शासनाने सातवा वेतन आयोग नुकताच घोषित केला. मात्र या आयोगात कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात शुक्रवारी अपर जिल्हाधिकारी के.आर. परदेशी यांना निवेदन सोपविण्यात आले आहे.
यात देशभरातील कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप महिला काँग्रेसने केला आहे. बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ या राज्यात झालेल्या पराभव व आगामी उत्तर प्रदेश व पंजाब राज्यातील होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर केंद्र शासनाने हा आयोग लागू केला.केंद्रातील भाजप सरकारने सातवा वेतन आयोग लागू करून देशभरातील कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली. २ वर्षांची परंपरा कायम ठेवली असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनमोहनसिंग सरकार असताना पी. चिदंबरम यांनी सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ रोजी लागू होईल, असे सुचविले होते. परंतु आताचे भाजपा सरकारने जून २०१६ पर्यंत यासाठी प्रतीक्षा करायला लावली. वेतनवाढ व भत्ता मूळ वेतनाच्या १५ टक्के असून तो २३.५ टक्के असेल, अशी चुकीची माहिती केंद्र शासनाने दिली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. ही वाढ काँग्रेस सरकाने ४ टक्के प्रस्तावित केली होती. मोदी सरकारने छुप्या पद्धतीने कर्मचाऱ्यांचा घात केला आहे. शासनाने सातवा वेतन आयोग दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याची वाढ बंद आयकरात कोणतीही सूट नसल्याने वाढलेल्या वेतनावर ४ टक्के सेस भरावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयकर अधिक भरावा लागल्यामुळे वर्षाच्या १२ महिन्यांपैकी १० महिन्यांचा पगार हातात येईल, अशा पद्धतीने भाजपा सरकारने दिशाभूल केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. निवेदन देतेवेळी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, शहरध्यक्ष अर्चना सवाई, भारती गावंडे, कुंदा अनासाने, जयश्री वानखडे, अत्तर मिर्झा, योगिता गिरासे, संगीता धोंडे, शोभा आसानी, अभिलाषा गजबीय, मंदा चौव्हाण, नाजमा परविन आदी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)