शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

वरूडमध्ये ठिबक, तुषार सिंचनाचे ३४२ प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: February 25, 2016 00:12 IST

विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत जलव्यवस्थापन करुन सिंचनाकरिता शेतकऱ्याकडून ठिबक आणि तुषार सिंचनाचे ...

अनुदान नाही : २ कोटी ९३ लाख १२ हजारांचा निधी अपेक्षितवरूड : विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत जलव्यवस्थापन करुन सिंचनाकरिता शेतकऱ्याकडून ठिबक आणि तुषार सिंचनाचे सन २०१४-१५ चे ३४२ प्रस्ताव अनुदानाअभावी तालुका कृषी कार्यालयात धूळखात असल्याने प्रलंबित आहेत. याकरिता २ कोटी ९३ लाख १२ हजार रुपये अनुदान अपेक्षित असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तातडीने अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुक्याचे नांव देशात अग्रेसर आहे. संत्रा, हळद, गहू, हरभरा, सोयाबिन, कपाशी, मिरचीचे पीक मोठया प्रमाणावर घेतले जाते. तालुक्यात विहिरी आणि बोअर मोठया प्रमाणावर असून पाण्याचा उपसा सुध्दा मोठया प्रमाणावर असल्याने पाणीटंचाई जाणवत असते. परंतु जलव्यवस्थापन, पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, नालाखोलीकरण या माध्यमातून भूजल पातळी वाढविण्याचे कार्यक्रम सुरु आहेत. परंतु पिके जगविण्याकरीता शेतकऱ्यांना सतत धडपड करावी लगाते. याकरीता विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत मिळणाऱ्या अनुदानावरील ठिबक व तुषार सिंचन योजनेचा लाभ घेऊन पिके जगविण्याचा प्रयत्न असतो. याकरतीा सन २०१४-१५ मध्ये २४२ तर तुषार सिंचनाकरिता १०० अशा ३४२ प्रस्तावांसह १ कोटी ६५ लाख रुपये अनुदानाचे लक्ष्य होते. परंतु ठिबक सिंचनाकरिता एक हजार ८६ तर तुषार सिंचनाकरीता २९८ प्रस्ताव प्राप्त झाले होते. याकरीता ४ कोटी ४८ लाख ३३ हजार रुपयांचे अनुदान आवश्यक होते. यापैकी तालुका कृषी कार्यालयाकडून ठिबक सिंचनाकरीता ४२९ लाभार्थी ४५० हेक्टर ४५ आर जमिनीच्या क्षेत्राकरीता एक कोटी ३७ लाख ९३ रुपयांना परवानगी मिळाली होती तर तुषार सिंचनाकरिता १०८ लाभार्थी ९७ हेक्टर २ आर जमिनीकरिता १७ लाख २८ हजार रुपये असे ५३७ लाभार्थी, ५४७ हेक्टर ६५ आर क्ष्ोत्राकरीता एक कोटी ५५ लाख २१ हजार रुपयांच्या अनुदानाला पूर्व परवानगी देण्यात आली होती. उर्वरित ठिबक सिंचनाचे ६३४ लाभार्थी, ६३५ हेक्टर ५५ आर क्षेत्राकरिता २ कोटी ७४ लाख ८६ हजार रुपये अनुदान आणि तुषार संचाचे १८१ लाभार्थी १८१ हेक्टर क्षेत्राकरिता १८ लाख २६ हजार रुपये अनुदानाचे एकूण २ कोटी ९३ लाख १२ हजार रुपयाचे ठिबक व तुषार सिंचन प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयात धूळखात पडले आहेत. या प्रस्तावांना अनुदानाची प्रतीक्षा असल्याने शेतकऱ्यामध्ये असंतोष उफाळून आला आहे. कृषी विभागाने तातडीने ठिबक व तुषार सिंचन योजनेचे अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात ठिबक व तुषार सिंचन झाले नाही तर पिके धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)