शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

३४ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाई वाटपात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:12 IST

मोर्शी : महाआघाडी सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांना गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार ...

मोर्शी : महाआघाडी सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांना गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार २०० रुपयांची मदत उपलब्ध करून आधार दिला. तथापि, तालुक्यातील ३७ हजार ९६० शेतकऱ्यांच्या ४० हजार ५४० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आजही मोर्शी तालुक्यातील शेकडो शेतकरी या नुकसानभरपाई मदतीपासून वंचित आहेत.

मोर्शी तालुक्यात ४ सप्टेंबर २०१९ रोजी अतिवृष्टीने पडझड झालेल्या घर पुनर्बांधणी व दुरुस्तीकरिता ४६ लक्ष ४९ हजार ६६० रुपये निधी प्राप्त झाला होता. मात्र, तो निधी ३१ मार्च २०२० रोजी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व्यपगत होऊन शासनाकडे परत गेला. शेतकरी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत असताना, तहसीलदार मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन आल्यापावली परत करीत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तहसीलदारांप्रति प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या मदतीपासून वंचित राहिलेल्या लाभार्थींना परत गेलेला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रूपेश वाळके यांनी सांगितले.