शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकाऱ्यांचा ४६ किमी सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:30 IST

अमरावतीहून तीन तासांत गाठले दर्यापूर, मंगळवारी ‘नॉन मोटर व्हेईकल’ अभियान सचिन मानकर - दर्यापूर : महापलिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे ...

अमरावतीहून तीन तासांत गाठले दर्यापूर, मंगळवारी ‘नॉन मोटर व्हेईकल’ अभियान

सचिन मानकर - दर्यापूर : महापलिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या धर्तीवर दर्यापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी गीता वंजारी यांनी सोमवारी सायकलनेच कार्यालय गाठले. तत्पूर्वी, रविवारी त्यांनी अमरावती येथील निवासस्थानाहून ४६ किमी अंतर सायकल चालवित दर्यापूर गाठले. वंजारी या तीन तास सायकल चालवून दर्यापुरात पोहोचल्या. आता दर मंगळवारी ‘नॉन मोटर व्हेईकल’ अभियान जाहीर करण्यात आले आहे.

राज्य शासनाने ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत महापालिका, नगर परिषदा, नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतींमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. शहरी भागातील वायुप्रदूषण रोखण्यासाठी सायकल वापरण्यास प्रोत्साहन देणे व त्याची व्यापक जनजागृती करणे हेसुद्धा मूल्यांकनात अंतर्भूत आहे. त्याअनुषंगाने दर्यापूर शहरात ‘नॉन मोटर व्हेईकल’ला प्रोत्साहन देण्यासाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी गीता वंजारी यांनी स्वत: सायकल चालविण्याचे ठरविले. १३ डिसेंबर रोजी अमरावती- भातकुली- जसापुर- दर्यापूर असा प्रवास त्यांनी सायकलने पूर्ण केला. सोमवारपासुन त्यांनी आपल्या कार्यालयातसुद्धा सायकलनेच येण्याचे ठरविले आहे. नगरपालिकेत, शहरात विविध कामांसाठी शक्य होईल तेव्हा सायकलनेच जाण्याचे त्यांनी ठरविले आहे. शहरातील नागरिकांना सायकल वापरायला सांगायचे, तर आधी आपणच ती सवय अंगीकारली पाहिजे, या भावनेने त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

कोट:

सायकल चालविण्याविषयी लोकांच्या मनात काही शंका असतात. सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्या शहराचा विस्तार अडीच किमीपेक्षा अधिक नसल्याने सायकल वापरणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त पायी चालणे, सायकल चालवावी.

गीता वंजारी, मुख्याधिकारी, दर्यापूर