शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

ेगावागावांत रंगू लागल्या भावी मुख्यमंत्र्याच्या गप्पा

By admin | Updated: October 25, 2014 02:03 IST

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता गावा गावात राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण होणार ?

अमरावती : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता गावा गावात राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण होणार ? याबाबतच्या चर्चानी ग्रामीण भागात चांगलाच जोर पकडला आहे विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल एकदाचा लागून सहा दिवस लोटून गेले. मात्र, या निकालात भाजपला भरभरून मतदारांनी मतेही दिली. मात्र, कुठल्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. परिणामी सर्वाधिक संख्या असलेल्या भाजपला सत्तेसाठी लागणारा मॅजीक आकडा पूर्ण करण्यासाठी कुणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे. हे राजकीय समीकरण सर्वश्रूत आहे. मात्र नव्या सरकारमध्ये भावी मुख्यमंत्री कोण ? याची उत्सुकता सर्वसामान्यांनाही लागली आहे. नेमके याच विषयावर गावा गावात आता चर्चा रंगू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत मागील २५ वर्षापर्यंत युती असलेले भाजप, शिवसेना आणि १५ वर्षांपासून आघाडी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे राजकीय पक्ष पहिल्यांदाच एवढ्या वर्षांचा घरोबा तोडून वेगवेगळे ऐकमेकांविरोधात लढले. या लढतीत मतदारांनी आपल्या मताचा कौल सर्वाधिक भाजपाच्या पारड्यात टाकला. तर त्यापाठोपाठ शिवसेनला, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आणि कॉंग्रेस या पक्षांना आपल्या मताची मतदारांनी पसंती मतदान रूपाने दिली आहे. मतदारांनी मात्र हा कौल देताना स्पष्ट बहूमत कुठल्याही पक्षाच्या बाजूने दिले नाही. परिणामी सत्तास्थापनेसाठी भाजप हा पक्ष प्रमुख दावेदार आहे. विधानसभेचा निकाल जाहीर होऊन जवळपास सहा दिवसांचा कालावधी लोटून गेला आहे. अशातच ऐन सत्ता स्थापनेच्या कालावधीतच दिवाळी सण आल्याने यासाठी होणाऱ्या राजकीय उलथापालथही थंडावल्या आहेत.मात्र हे सर्व बरोबर असले तरी भाजपाच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये भावी मुख्यमंत्री कोण? गडकरी की फडणविस याबाबतच्या चर्चा गावा गावात सुरू झाल्या आहेत. भाजपा कुणाला मुख्यमंत्री म्हणून निवडणार याबाबतही वरील दोन विदर्भातील नेत्यांबाबत चर्चे दरम्यान व्यक्ती महत्वावरही आप-आपली मते मांडून आपल्यासोबत गप्पा करणाऱ्या इतर चार चौघांना पटवून देत असल्याचेही गावा गावातील चौकाचौकात , ओट्यावर चालणाऱ्या गप्पाच्या फडावर दिसून आल्या. अशावेळी रस्त्याने जाणारा एखादा गावातील पुढाऱ्यांनाही गाव गप्पा करणारे आवर्जुन विचारत ‘का रे, बा कोण होईल मुख्यमंत्री?’ याबाबत अशा व्यक्तीचीही मते मात्र जाणून घेतली जात आहे . एकंदरीत राज्याच्या भावी मुख्यमंत्र्याचे वेध राजकारण्याशिवाय सर्वसामान्यांना लागल्याचे यावरून दिसून येते.