शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

११४ उमेदवारांनी गमावली अनामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 6:00 AM

नोटा हे वैध मत असले तरी अनामत रकमेसाठी ही मते वगळता फक्त वैध मतांचा हिशेब केला जातो. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत धामणगाव रेल्वे मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी ३३,०८६ मते मिळविणे आवश्यकता होती यामध्ये वीरेंद्र जगताप यांच्यासह भाजपाचे अरुण अडसड यांनाच अपेक्षित मतांचा कोटा पूर्ण करता आला.

ठळक मुद्देविधानसभा २०१४ ची स्थिती : आठ मतदारसंघांमध्ये १३५ उमेदवार

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्ये १३५ उमेदवार रिंगणात होते. यापैकी फक्त २१ उमेदवारांचे डिपॉझिट वाचले. उर्वरित ११४ म्हणजेच ८५ टक्के उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली नाही. यामध्ये राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे.नोटा हे वैध मत असले तरी अनामत रकमेसाठी ही मते वगळता फक्त वैध मतांचा हिशेब केला जातो. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत धामणगाव रेल्वे मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी ३३,०८६ मते मिळविणे आवश्यकता होती यामध्ये वीरेंद्र जगताप यांच्यासह भाजपाचे अरुण अडसड यांनाच अपेक्षित मतांचा कोटा पूर्ण करता आला. या ठिकाणी १७ उमेदवारांना अनामत रक्कम गमावावी लागली.बडनेरा मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी आवश्यक २९,६४६ मतांचा कोटा फक्त रवि राणा, शिवसेनेचे संजय बंड, भाजपचे तुषार भारतीय, काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनाच पूर्ण करता आला. या मतदारसंघात ११ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. अमरावती मतदारसंघात २० उमेदवार रिंगणात होते. यामध्ये अनामत रक्कम वाचविण्यासाठी २६,७११ मतांचा कोटा फक्त भाजपाचे सुनील देशमुख व काँग्रेसचे रावसाहेब शेखावत पूर्ण करू शकले. या ठिकाणी १८ उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली नाही.मोर्शी मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघात अनामत रक्कम वाचविण्यासाठी ३०,६४४ मतांची आवश्यकता होती. मात्र, भाजपचे अनिल बोंडे व राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार हर्षवर्धन देशमुख यांचे डिपॉझिट वाचले. उर्वरित १७ उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली. मेळघाट मतदारसंघात एकूण सहा उमेदवार रिंगणात होते. यापैकी भाजपचे प्रभुदास भिलावेकर, काँग्रेसचे केवलराम काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार पटेल हेच आवश्यक २८,६८८ मतांचा कोटा पूर्ण करू शकले. अन्य तीन उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.अचलपूर मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात होते. यापैकी बच्चू कडू व भाजपचे अशोक बनसोड आवश्यक २९,८१९ मतांचा कोटा पूर्ण करू शकले. उर्वरित १७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. तिवसा मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, भाजपच्या निवेदिता चौधरी (दिघडे) व शिवसेनेचे दिनेश वानखडे हे उमेदवार अनामत रक्कम वाचविण्यासाठी आवश्यक २८,१७४ मतांचा कोटा पूर्ण करु शकले. उर्वरित १५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. दर्यापूर मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात होते. यापैकी भाजपचे रमेश बुंदिले, शिवसेनेचे अभिजित अडसुळ व रिपाइंचे बळवंत वानखडे आवश्यक ३०,३२५ मतांचा कोटा पूर्ण करू शकले. उर्वरित उमेदवारांची अनामत शासनजमा झाली.अनामत रकमेसाठी असे आहे गुणोत्तरराजकारणात स्पर्धक किंवा विरोधकाचा उल्लेख करताना अनेकदा ‘डिपॉझिटही वाचले नाही’ असा उपहासाने उल्लेख केला जातो. अनामत रक्कम जप्त झाली म्हणजे नेमके काय झाले, असा प्रश्न कुतूहलाने विचारला जातो. एकूण वैध मतांच्या १/६ मते न मिळाल्यास त्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त केली जाते. यामध्ये नोटाला मिळालेली मते गृहीत धरले जात नाहीत.१०.४५ लाख रक्कम शासनाकडे जमाविधानसभेसाठी सर्वसाधारण मतदारसंघात १० हजार व राखीव मतदारसंघासाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम असते. २०१४ च्या निवडणुकीत ११४ उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली नाही. राखीव असलेल्या मेळघाट व दर्यापूरमध्ये १९ उमेदवारांचे ९५ हजार व अन्य सहा मतदारसंघांत ९५ उमेदवारांचे ९.५० लाख अशी एकूण १०.४५ लाख रुपयांची अनामत रक्कम शासनजमा झाली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019