शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांचे अनुदान काढणारे दलाल सक्रिय

By admin | Updated: May 17, 2014 23:14 IST

निराधार, वृध्दांना आधार मिळवून देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. मात्र, चुकीच्या नियोजनामुळे या योजना लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

चांदूरबाजार : निराधार, वृध्दांना आधार मिळवून देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. मात्र, चुकीच्या  नियोजनामुळे या योजना  लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. लाभार्थ्यांंना थेट अनुदान मिळावे म्हणून शासनाने  निराधार योजनांची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे धोरण अवलंबिले. आता निरक्षर व निराधार  वृध्दांना त्यांच्या अनुदानाची रक्कम बँकेतून काढून देण्यासाठी पैसे उकळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. बँक  परिसरात  यासाठी दलाल सक्रिय झाल्याचे चित्र आहे.  
यावर आळा घालण्यासाठी प्रशासन अथवा बँक प्रशासनातर्फे अद्यापपर्यंंत पावले उचलल्या न गेल्यामुळे लाभार्थी  नाडवला जात आहे. शासनामार्फत महिला, वृध्द, निराधार, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यासारख्या अनेक  योजनांच्या माध्यमातून वृद्ध व निराधारांना अनुदान स्वरुपात आर्थिक मदत केली जाते. ही मदत दर दोन किंवा तीन  महिन्यांनंतर संबंधित लाभार्थ्यांंच्या बँक खात्यात महसूल प्रशासनामार्फत जमा केली जाते. एका लाभार्थ्यांंला दर तीन  महिन्यांनंतर ६00 ते १२00 रुपये प्राप्त होतात. ही रक्कम काढण्यासाठी लाभार्थी शेकडोंच्या संख्येत बँकेत  जातात. यात बहुतेक लाभार्थी वृध्द व निरक्षर असतात. नेमका याच बाबीचा फायदा घेऊन बँक परिसरात दलाल  सक्रिय झाले आहे. या मोबदल्यात हे दलाल संबंधित लाभार्थ्यांंकडून १0 ते ५0 रुपयांपर्यंंत रक्कम उकळतात.  इतकेच नव्हे तर पैसे देण्यास नकार देणार्‍या लाभार्थ्यांंना पैसे मिळविण्यात अडचणी आणतात. अनुदान बंद  होण्याची भीती दाखवितात. त्यामुळे नाईलाजाने का होईना लाभार्थ्यांंना नाहक भुर्दंंड सहन करावा लागत आहे.
 राष्ट्रीयीकृत बँका तालुकास्थळी असल्याने येथे शिरजगाव बंड, जैनपूर, जवळा, आखतवाडा, वडाळा, हैदतपूर,  जसापूर, कुरळ सोनोरी, नानोरी, खराळा,खरवाडी आदी गावखेड्यातील विविध अनुदान योजनेचे वृध्द व निराधार  लाभार्थी येथे येतात. त्यांना ४0 ते ५0 रुपये प्रवास भाडे द्यावा लागतो. बँकेत पैसे मिळण्यासाठी अख्खा दिवस  जातो. काहींना विलंबाअभावी रिकाम्या हाती परतावे लागले. 
इतकेच नव्हे तर बँकेतही वशिलेबाजीचा सामना लाभार्थ्यांंना करावा लागतो. तसेच बँकेतही या लाभार्थ्यांंना कुणाची  मदत मिळत नसल्याने दलालांचे सहकार्य घ्यावे लागत आहे. सहकार्य करायचे म्हटले की, दलालांना पैसे द्यावेच  लागतात. त्यामुळे मिळालेल्या अनुदानालाही कात्री लागते याची दखल कोण घेणे गरजेचे आहे. (तालुका  प्रतिनिधी)