शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

ज्याची बादली पाण्याने भरली, तो नशीबवान; मेळघाटातील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 05:00 IST

चिखलदरा तालुक्यातील खडीमलसह २० गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना आदिवासी करीत आहेत. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मेळघाटात २५ वर्षांपासून हीच अवस्था आहे. पाणीपातळी खालावल्याने लाखो रुपयांच्या योजना मृत पडल्या. टँकरशिवाय कुठलाच पर्याय नाही. नादुरुस्त वजा बेपत्ता रस्त्यांवरून पाणी पोहचवले जात आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच अनेक गावांच्या घशाला कोरड पडली.

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : त्यांची सकाळ पाण्याने नव्हे, तर पाण्याच्या प्रतीक्षेत जाते. चातकाप्रमाणे ते टँकरची वाट पाहतात. टँकर ओतला गेला की, संपूर्ण गाव धावत सुटते विहिरीकडे. दोरखंडाने बांधलेल्या शेकडो बादल्या एकाच वेळी विहिरीत पडतात. मात्र, ज्याची बादली पाण्याने भरली, तो नशीबवान. हे चित्र आहे मेळघाटातील खडीमल गावाचे. चिखलदरा तालुक्यातील खडीमलसह २० गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना आदिवासी करीत आहेत. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मेळघाटात २५ वर्षांपासून हीच अवस्था आहे. पाणीपातळी खालावल्याने लाखो रुपयांच्या योजना मृत पडल्या. टँकरशिवाय कुठलाच पर्याय नाही. नादुरुस्त वजा बेपत्ता रस्त्यांवरून पाणी पोहचवले जात आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच अनेक गावांच्या घशाला कोरड पडली.पाणी अन्य तालुक्यांनामेळघाटात पायथ्याशी असलेल्या शहानूर धरणातून अंजनगाव, दर्यापूर तालुक्यांना, चंद्रभागा धरणावरून अचलपूर, परतवाडा शहर, तर सापन प्रकल्पातून चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यातील ८५ गावांना पाणीपुरवठा होतो. मात्र, पाणी देणाऱ्या तालुक्यातील आदिवासींची भटकंती होत आहे.

खडीमलची अवस्था सर्वांत भीषणखडीमल या आठशे लोकवस्तीच्या पाड्याला तीन किलोमीटर अंतरावरील नवलगाव येथील विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. वीज नसल्याने सौरऊर्जा पंपावर दोन टँकर भरला जाईल एवढेच पाणी निघते. हे पाणी विहिरीत टाकल्यावर आदिवासी बादलीने ओढून नेतात. रस्ताच अत्यंत खराब असल्याने प्रशासनाला दुसरा टँकर लावता आला नाही. नजीकच्या नदी-नाल्यात झिरे खोदून पाण्याचा शोध घेण्याचा व्यर्थ प्रयत्न करतात.

हातपंप निकामेआदिवासी पाड्यांमध्ये दीडशेवर हातपंप पाणी खोलवर केल्याने कोरडे पडले आहे. चारशेच्या जवळपास हातपंप परिसरात आहेत. उन्हाळ्यात दरवर्षी ही स्थिती असते. 

२० गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खडीमल येथे अतिरिक्त टँकरने पुरवठा होणार आहे. वीजपुरवठा नसल्याने टँकर भरला जात नाही. रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यावर उपाय काढले जात आहे.- जयंत बाबरे, गटविकास अधिकारी, चिखलदरा

२० गावांमध्ये टँकरचिखलदरा तालुक्यातील आवागड, खंडुखेडा, खोंगडा, एकझिरा, गौलखेडा बाजार, धरमडोह, बहादरपूर, आकी, नागापूर, सोमवारखेडा, मोथा, आलाडोह, लवादा, बगदरी, तोरणवाडी, तारूबांदा, रायपूर, खडीमल आदी २० गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात