शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

बर्ड फ्लूचा विषाणू उष्णतेस संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:29 IST

अमरावती : बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सर्व खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. बर्ड फ्लूचा विषाणू ...

अमरावती : बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सर्व खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. बर्ड फ्लूचा विषाणू उष्णतेबाबत संवेदनशील आहे. व्यावसायिक चिकन विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, नागरिक यांनीही आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेनेही परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यानुसार पुणे, सोलापूर, नवेगाव बांध परिसरातून पक्षी आणणे, स्थलांतरित करणे याबाबत अधिक दक्षता घेण्याचे परिपत्रकात नमूद आहे. पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे, खाद्य देण्यात येणारी भांडी डिटर्जंटने स्वच्छ धुवावी. शिल्लक मांसाची योग्य विल्हेवाट लावावी. एखादा पक्षी मरण पावला, तर उघड्या हाताने स्पर्श करू नये. तात्काळ नियंत्रण कक्षाला कळवावे. पोल्ट्री उत्पादकांनी व तेथील कामगारांनी हातांची स्वच्छता व परिसर नियमित स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

कच्चे चिकन उत्पादन हाताळताना मास्क व ग्लोव्हज वापरावेत. घरानजीक तळे असल्यास व तेथील पक्ष्यांचा वावर असल्यास वनविभाग किंवा पशुसंवर्धन विभागाला माहिती द्यावी. आजारी किंवा सुस्त पडलेल्या पक्ष्यांच्या संपर्कात येऊ नये, अशी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

योग्यप्रकारे शिजवलेले कुक्कुट उत्पादने खाणे सुरक्षित असते. हा विषाणू उष्णतेस संवेदनशील आहे. त्यामुळे योग्य शिजवून खाल्लेल्या चिकनपासून धोका राहत नाही. अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटिग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे, असेही नमूद करण्यात आले आहे