शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
3
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
4
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
5
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
6
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
7
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
8
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
9
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
10
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
11
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
12
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
13
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
14
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
15
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
16
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
17
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
18
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
19
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
20
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
Daily Top 2Weekly Top 5

बँकांचा पालकमंत्र्यांना ‘दे धक्का’

By admin | Updated: July 2, 2015 00:10 IST

खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाल्यावरही बँकांचा पीककर्ज वाटपाचा टक्का वाढत नसल्याची बाब पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गांभीर्याने घेतली.

शासन निर्देशाला ‘खो’ : ३० जून ‘डेडलाईन’पर्यंत ५० टक्केच पीककर्ज वाटपगजानन मोहोड अमरावतीखरिपाच्या पेरणीला सुरुवात झाल्यावरही बँकांचा पीककर्ज वाटपाचा टक्का वाढत नसल्याची बाब पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गांभीर्याने घेतली. २१ जून रोजी या संदर्भात आयोजित बैठकीत त्यांनी उपस्थित सर्व बँक अधिकाऱ्यांना ३० जूनच्या आत पीककर्ज वाटपाचे निर्देश दिले होते. मात्र, बँकांनी या आदेशांची अवहेलना करून पालकमंत्र्यांना ‘धक्का’ दिला आहे. ३० जूनपर्यंत सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांनी केवळ ५० टक्केच कर्जाचे रुपांतरण करुन कर्जवाटप केले आहे. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर जिल्हा सहकारी बँक आहे त्याच टक्क्यावर स्थिरावली तर अन्य बँकांनी फक्त कर्जवाटपात ९ टक्क्यांनी वाढ केली आहे. जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर खरीप पेरणीला वेग आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५५ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. १५ जुलैपर्यंत कर्जरुपांतरणाचे आरबीआयचे निर्देशराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत २४ जून रोजी झालेल्या बैठकीनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने शेतीकर्जाचे रुपांतरण व पीककर्ज मंजूर करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत दिल्याचे पत्र भारतीय रिझर्व्ह बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर डी.बी.व्ही.राजू यांनी पत्राद्वारे बँकांना कळविले आहे. जिल्हा बँकेचे जून महिन्यात ५ टक्केच वाटपशेतकऱ्यांची बँक म्हणविल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १ जूनपर्यंत ५३ टक्के कर्जवाटप केले होते. २० जूनपर्यंत ५७ टक्के तर ३० जूनपर्यंत ५८ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. म्हणजेच जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना गरज असताना जून महिन्यात केवळ ७ टक्केच कर्जवाटप केले आहे व ५८ टक्के कर्जवाटपावर जिल्हा बँक स्थिरावली आहे. बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली. एक हजार कोटी रुपये पीककर्जाचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवाटपाचा टक्का वाढविला आहे. परंतु जिल्हा बँकेचे कर्जवाटप मंदावले आहे. शनिवारी याविषयी बैठक बोलविण्यात आली आहे. - प्रवीण पोटे, पालकमंत्रीकर्जाचे रुपांतरण व नव्याने कर्ज देण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये एकेका शेतकऱ्याला तर सहकारी बँकेत एकाच वेळी शेकडो शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. - अनंत खोरगडे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडियाबँकांना कर्ज रुपांतरण व नव्याने पीक कर्ज मंजुरी करिता १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५० टक्के कर्जवाटप झाले असून वाटपाची प्रक्रिया सुरु आहे. - गौतम वालदेजिल्हा उपनिबंधक, (सहकारी संस्था)