शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

एसीपींच्या तक्रार पेट्यांना एकवर्ष पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:11 IST

जिल्ह्यात साडेतीनशे तक्रार पेट्या लोकोपयोगी उपक्रम अनिल कडू परतवाडा : जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी त्यांच्या कल्पकतेतून ...

जिल्ह्यात साडेतीनशे तक्रार पेट्या लोकोपयोगी उपक्रम

अनिल कडू

परतवाडा : जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी त्यांच्या कल्पकतेतून लोकोपयोगी उपक्रमांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी लावलेल्या साडेतीनशे तक्रार पेट्यांना एक वर्ष पूर्ण झाले. जानेवारी २०२० मध्ये त्यांनी जिल्हाभर आपल्या अखत्यारीतील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या पेट्या वितरित केल्या आहेत. शाळा, महािवद्यालयांसह शहरातील, गावांतील चौकाचौकांत, वर्दळीच्या मोक्याच्या ठिकाणी लावल्या आहेत.

या कुलूपबंद पेट्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणात आहेत. नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आपल्या भावना, तक्रारी दुसऱ्यावरील अन्यायाविरुद्धची चीड, पोलीस प्रशासनातील उणीव, पोलिसांची वागणूक अवैध धंद्याची माहिती, त्रास देण्याऱ्यांची नावे, कारवाईबाबतची अपेक्षा आणि गुन्हेगारांसह चिडीमारांची नावे थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहचविण्यास या तक्रार पेट्या उपयुक्त ठरल्या आहेत.

या पेट्या लावण्यापूर्वी खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी शाळा, महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी, प्रसंगानुरुप नागरिकांशी व पालकांशी संवाद साधला. पेट्यांची उपयुक्तता आणि कार्यपद्धतीबाबत स्वत:ची कार्यपद्धती व भूमिका त्यांनी मांडली. निर्भीडपणे आपल्या तक्रारी, सूचना, या तक्रारपेटीच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत पोहचविण्याचे आवाहनही त्यांनी केले. निश्चित कार्यवाहीबाबत त्यांनी आश्वस्तही केले. गोपनीयतेची हमीही दिली.

या तक्रारपेट्या उघडून त्यातील तक्रारींची दखल घेण्याकरिता जिल्हास्तरावर एक स्वतंत्र स्कॉडही त्यांनी कार्यन्वित केले. या कुलूपबंद पेट्यांच्या किल्ल्या स्वत:कडे ठेवल्यात. दर शनिवारी किंवा ठराविक अवधीनंतर या पेट्या उघडल्या जाऊ लागल्यात. या पेटीतील तक्रारी आणि तक्रारकर्त्यांबाबत गोपनियता बाळगली गेली. अनेक प्रकरणांत पेटीतील तक्रारीच्या अनुषंगाने कारवाईसुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून केल्या गेली. यात या लोकोपयोगी उपक्रमातील या तक्रारपेट्या नागरिकांसह, विद्यार्थी व पालकांना दिलासादायक ठरल्या आहेत.

या पेट्यांची उपयोगिता बघता नागरिक, विद्यार्थी त्या पेट्यांकडे वळले असून, लॉकडाऊनचा अपवाद वगळता आजही त्या पेट्या उघडल्या जात आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांचा हा लोकोपयोगी उपक्रम राबविला जात आहे.

जिल्हाभर लावल्या गेलेल्या या तक्रार पेट्यांचे लोकेशनही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे उपलब्ध आहेत. चार-दोन अपवाद वगळता वर्षभरापूर्वी लावलेल्या त्या सर्व तक्रार पेट्या आपआपल्या लोकेशनवर आज ही कायम आहेत. या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक थेट लोकांच्या पाठीशी उभे आहेत.