शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

६२ वर्षांनंतर जिल्ह्याला मिळणार केंद्रीय मंत्रीपद?

By admin | Updated: May 17, 2014 23:09 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ मध्ये पहिल्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली. अर्थातच काँग्रेसने सत्ता स्थापन केली. यावेळी देशाचे पहिले कृषिमंत्री होण्याचा मान

अमरावती : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ मध्ये पहिल्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली. अर्थातच  काँग्रेसने सत्ता स्थापन केली. यावेळी देशाचे पहिले कृषिमंत्री होण्याचा मान अमरावतीतून डॉ. पंजाबराव उपाख्य  भाऊसाहेब देशमुख यांना मिळाला. तेव्हापासून म्हणजे तब्बल ६२ वर्षांनी पुन्हा अमरावती जिल्ह्याच्या वाट्याला  केंद्रीय मंत्रीपद येण्याची सुखावह चिन्हे दिसू लागली आहेत.
सोळाव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली.    ‘मोदी’फॅक्टरचा झंझावात काँग्रेसचे  पानितपत करणारा ठरला. देशभर कमळ फुलले. स्थानिक पातळीचा विचार करता सत्ता स्थापनेत घटक पक्ष  असलेल्या शिवसेनेचे आनंदराव अडसूळ पाचव्यांदा लोकसभेत गेले. ते  लोकसभेत सलग दुसर्‍यांदा अमरावती  जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतील. आनंदरावांची सिनिअँरिटीआणि राजकारणाची जाण लक्षात घेऊन  यावेळी त्यांना  केंद्रीय मंत्रीपद नक्की मिळणार, अशी अनेकांना आशा आहे. असे झाल्यास अडसुळांच्या रुपाने १९५१ नंतर  अमरावतीला पुन्हा केंद्र सरकारचा ‘लालदिवा’ मिळेल, अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे.
देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सन १९५१ पासून १९६२ पर्यंत लोकसभेत अमरावतीचे  प्रतिनिधीत्व केले. त्यांना देशाचे पहिले कृषिमंत्री होण्याचा बहुमान मिळाला. त्यानंतर अमरावतीचा गड काँग्रेसने  १९८९ पर्यंत राखला. यादरम्यान देशात काँग्रेस पक्षाचीच सत्ता होती. मात्र, येथील काँग्रेसच्या खासदाराला  ‘लालदिवा’ मिळू शकला नाही. त्यानंतर अमरावतीच्या राजकीय आसमंतात १९९६ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा  भगवा फडकला. सन २00९ पासून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघात दुसर्‍यांदा  विजयी झाले. पहिल्यांदा १९९६ मध्ये ते लोकसभेत गेले. त्यानंतर १९९९ व २00४ मध्ये त्यांनी खासदारकीची  हॅट्ट्रिक केली.  त्यानंतर अमरावती मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने त्यांनी बुलडाण्यातून येऊन   शिवसेनेतर्फे २00९ मध्ये निवडणूक लढविली आणि जिंकली सुध्दा. यंदा ‘मोदी लहरी’मुळे असो वा अन्य  कारणांनी त्यांचा लोकसभेतील पाचवा विजय ठरला. २00३ -२00४ मध्ये वाजपेयी सरकारमध्ये ते केंद्रीय अर्थ  राज्यमंत्री होते.अडसूळ सेनेचे दुसर्‍या फळीतील नेते आहेत. यामुळे अमरावतीला ते पुन्हा लालदिवा मिळवून देतील  काय? याबद्दल चर्चा रंगत आहेत.