शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

सव्वातीन हजार शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 5:00 AM

शासकीय केंद्रावर कापूस विक्रीसाठी तालुक्यातील ३८९२ शेतकऱ्यांनी ठरलेल्या मुदतीत नोंद केली. यापैकी ६४३ शेतकºयांकडून लेहेगाव या एका केंद्रावर २६ मेपर्यंत कापूस नेण्यात आला. उर्वरित ३२४९ शेतकरी कापूसकोंडीत आहेत. एका केंद्रावर शंभर शेतकऱ्यांचा कापूस मोजणीचा आदेश असला तरी मजुरांची कमतरता, फिजिकल डिस्टन्सिंग यामुळे ही संख्या निम्म्याहून कमी आहे.

ठळक मुद्देदोन केंद्रे वाढली : कामाची गती वाढवा; खरिपाच्या तोंडावर कापूस घरीच

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : पेरणी तोंडावर आली असताना तालुक्यातील सव्वतीन हजार शेतकरी कापूस मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. खरेदीचा वेग वाढावा म्हणून आणखी दोन केंद्रे २७ मेपासून वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ती सुरू झाली असून, यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे का, याची खारतजमा पथके नेमून केली जात असल्यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.शासकीय केंद्रावर कापूस विक्रीसाठी तालुक्यातील ३८९२ शेतकऱ्यांनी ठरलेल्या मुदतीत नोंद केली. यापैकी ६४३ शेतकºयांकडून लेहेगाव या एका केंद्रावर २६ मेपर्यंत कापूस नेण्यात आला. उर्वरित ३२४९ शेतकरी कापूसकोंडीत आहेत. एका केंद्रावर शंभर शेतकऱ्यांचा कापूस मोजणीचा आदेश असला तरी मजुरांची कमतरता, फिजिकल डिस्टन्सिंग यामुळे ही संख्या निम्म्याहून कमी आहे. यासाठी माहुली, शहापूर (वरूड) या केंद्रावर २७ मे पासून कापूस खरेदी सुरू असली तरी पावसाळ्यापूर्वी कापूस उचलणे कठीण झाले. पेरणी तोंडावर आली असताना विक्रीनंतरही चुकारे कधी मिळणार, याची चिंता शेतकऱ्यांना आहे.दुसरीकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा घरात कापूस आहे का, याची खातरजमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी सहायक निबंधकांना दिले असून, त्यांनी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी कृषिउत्पन्न बाजार समितीकडून घेतली आहे. सत्यता पडताळणीसाठी पथके नेमली असून, ही पथके २७ मेपासून कामी लागल्याचे सांगण्यात आले. व्यापाऱ्यांचा कापूस मोजण्यासाठी शेतकºयांचे सातबारे वापरल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रकारही प्रशासनाला दिसून पडत आहेत. हे याआधी झाले असते, तर आज व्यापाºयांऐवजी अनेक शेतकरी कापूस विकून मोकळे झाले असते . या अभियानातून किती शेतकऱ्यांना न्याय मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.लेहेगाव केंद्रावर ३० ते ४० शेतकरी कापूस मोजणीसाठी बोलावले जात होते. २७ मे पासून माहुली आणि शहापूर (वरूड) ही दोन केंद्रे सुरू झाल्यामुळे निश्चितच खरेदीचा वेग वाढेल; परंतु सव्वातीन हजार नोंदी शिल्लक आहेत.मोर्शी, हिवरखेड भागातील शेतकऱ्यांना शहापूर केंद्र दिले जाईल. माहुलीनजीकच्या शेतकऱ्यांना या केंद्रावर बोलावले जाईल. खरीप हंगामाच्या तोंडावर ही केंदे्र वाढली. कापूस निघाल्यावर सुरुवातीपासून शासनाने दखल घेतली असती, तर शेतकऱ्यांची लूट थांबली असती. शासकीय खरेदीचा भाव ५ हजार ५०० असला तरी व्यापारी ४२००, ४३०० रुपयांनी शेतकऱ्यांकडून कापूस मागत आहेत, शिवाय फरदड कापूस खरेदी करून शेतकऱ्यांच्या सात-बारावर विकत आहेत.

टॅग्स :cottonकापूस