शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

कोरोनामुळे पालक गमावलेल्या ६८ बालकांच्या खात्यात दरमहा जमा होणार ११०० रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:14 AM

अकोला : कोरोना काळात गत मे अखेरपर्यंत कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यात ८७ बालकांचे पालक गमावले असून, त्यापैकी जून अखेरपर्यंत ...

अकोला : कोरोना काळात गत मे अखेरपर्यंत कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यात ८७ बालकांचे पालक गमावले असून, त्यापैकी जून अखेरपर्यंत ६८ बालक बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. कोरोनामुळे पालक गमावलेल्या या बालकांच्या बॅंक खात्यात दरमहा १ हजार १०० रुपयांचे आर्थिक साहाय्य जमा करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणू संसर्गामुळे गत मे अखेरपर्यंत जिल्ह्यात १८ वर्षाआतील ८७ बालकांचे पालक गमावले. त्यामध्ये काहींची आई तर काहींच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे पालकांचे छत्र हरवलेल्या बालकांना शासनाच्या बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी जून अखेरपर्यंत ६८ बालकांना बालकल्याण समितीमार्फत पात्र ठरविण्यात आले. त्यामुळे बालसंगोपन योजनेंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या जिल्ह्यातील ६८ बालकांच्या बॅंक खात्यात दरमहा १ हजार १०० रुपये आर्थिक साहाय्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

१९ बालकांचे प्रस्ताव बालकल्याण समितीकडे सादर!

कोरोनामुळे जिल्ह्यात मे अखेरपर्यंत ८७ बालकांचे पालक गमावले. त्यापैकी जून अखेरपर्यंत ६८ बालकांना बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात आले असून, उर्वरित १९ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधित बालकांचा प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत बालकल्याण समितीकडे सादर करण्यात आला आहे.

१८ वर्षापर्यंतच मिळणार

योजनेचा लाभ!

काेरोना विषाणू संसर्गामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांना बालसंगोपन योजनेंतर्गत दरमहा १ हजार १०० रुपये आर्थिक साहाय्य दिले जाते. या योजनेत वयाच्या १८ वर्षापर्यंतच बालकांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

कोरोनामुळे मे अखेरपर्यंत जिल्ह्यात ८७ बालकांचे पालक गमावले असून, त्यापैकी आतापर्यंत ६७ बालकांना बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात आले असून, दरमहा १ हजार १०० रुपयांचे आर्थिक साहाय्य त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित १९ बालकांना योजनेचा लाभ देण्यासाठी बालकल्याण समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

विलास मरसाळे

जिल्हा महिला बालविकास अधिकारी