शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मोटर वाहन विभागात घंटागाड्यांची नोंदच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 1:37 PM

आता मात्र घंटागाडीवरील वाहन चालकांनी त्यांचे खरे रंग दाखविण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेच्या मोटर वाहन विभागाचा कारभार रसातळाला गेला असून, त्याचे परिणाम समोर येऊ लागले आहेत. या विभागाच्या अखत्यारीत असलेल्या घंटागाड्या बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही घंटागाड्या बेवारस स्थितीत असताना संबंधित जबाबदार वाहन चालकाला जाब विचारण्याची हिंमत विभाग प्रमुख श्याम बगेरे यांना नसल्यामुळे की काय, या विभागाचे ‘तीन-तेरा’ वाजल्याचे केविलवाणे चित्र आहे. या गंभीर प्रकरणाची महापालिका आयुक्त संजय कापडणीस दखल घेतील का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.शहरात दररोज २२० टनपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. २०१५ पूर्वी घरातून निघणारा कचरा सर्व्हिस लाइनमध्ये उघड्यावर टाकणे किंवा घरासमोर रस्त्यालगत फेकून दिल्या जात असल्याचे चित्र होते. मुख्य बाजारपेठेतही हीच स्थिती होती. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे ढीग साचल्याची परिस्थिती होती. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी प्रत्येक घरातून, बाजारपेठेतून कचरा जमा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ८० आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ४५ वाहनांची खरेदी केली. मनपाची आर्थिक स्थिती भक्कम नसल्यामुळे मानधन किंवा कंत्राटी तत्त्वावर वाहन चालकांची नियुक्ती करण्यापेक्षा घंटागाडीवर ‘स्वयंसेवकां’ची नियुक्ती करण्याचे धोरण पत्करले. घरातून कचरा जमा करण्याच्या बदल्यात प्रतिमहिना ३० रुपये आणि दुकाने, कमर्शियल कॉम्प्लेक्स, हॉस्पिटल, हॉटेल, महाविद्यालय व बाजारपेठमधून कचरा जमा करण्याच्या बदल्यात प्रतिमहिना २०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला.जमा केलेले शुल्क वाहन चालकाला मानधन म्हणून देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुरुवातीला काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू असताना आता मात्र घंटागाडीवरील वाहन चालकांनी त्यांचे खरे रंग दाखविण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.दुपारी २ वाजतापर्यंत कचरा जमा करून तो नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर टाकल्यानंतर घंटागाड्या मोटर वाहन विभागात जमा करणे अपेक्षित नव्हे बंधनकारक आहे. तसे होत नसल्यामुळे काही वाहने बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

इंधनात घोळ; रात्री ११ वाजता सेवा कशी?मनपाच्यावतीने प्रत्येक घंटा गाडीमध्ये त्या प्रभागाचे आणि नायगावातील डम्पिंग ग्राउंडचे अंतर लक्षात घेता किमान ६ ते ७ लीटर इंधन भरल्या जाते. दुसरीकडे रात्री ११ वाजता हॉटेलमधील अन्नपदार्थ चक्क राष्ट्रीय महामार्गालगत टाकण्यासाठी घंटा गाड्यांचा वापर होत असल्याचे दिसून येते. काही घंटा गाडी चालक भाजी बाजारातील सडका भाजीपाला व खानावळी, हॉटेलमधील शिळे अन्न जमा करून वराह पालन करणाºया व्यावसायिकांना विक्री करीत असल्याची माहिती आहे. हा सर्व खेळ रात्री चालत असताना मोटरवाहन विभागाने जाणीवपूर्वक डोळ््यांवर पट्टी बांधल्याचे चित्र दिसून येते.

वाहनांची दररोज नोंद ठेवणे क्रमप्राप्त आहे. सायंकाळी किंवा रात्री कचरा जमा करण्याचे कोणतेही निर्देश नाहीत. घंटा गाडीचा खासगी कामासाठी वापर होणे ही गंभीर बाब असून, यासंदर्भात विभाग प्रमुखांना जाब विचारला जाईल. दोषी आढळणाऱ्यांची गय केली जाणार नाही.- संजय कापडणीस,आयुक्त, मनपा

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला