शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती बस स्थानकावर रात्री प्रवाशांची घालमेल

By admin | Updated: May 27, 2014 19:30 IST

अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर रात्रीच्या वेळेस प्रवाशांची घालमेल असल्याचे दिसून येते.

अकोला : उन्हाळ्याची सुटी आणि लग्नसराईमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांना फार गर्दी वाढली आहे. अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर रात्रीच्या वेळेसदेखील हीच स्थिती कायम असल्याचे दिसून येते. रात्री १0 नंतर प्रवास करणार्‍या नागरिकांना अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर गाड्यांबाबत नेमकी माहिती मिळत नसल्याने त्यांची घालमेल होत असल्याचे दिसून येते.
सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असून, पालक वर्ग व बच्चे कंपन्यांनी मिळून नियोजित स्थळी जाण्यासाठी प्रवासाला निघत आहेत. त्यातच मे महिन्यात सर्वाधिक विवाह मुहूर्त असल्याने लग्न कार्य अटेंड करण्याची एक वेगळीच घाई बस स्थानकावर दिसून येते. भर दिवसा उन्हाचा तडाखा सहन करण्याऐवजी अनेक जण रात्रीचा प्रवास करणे पसंत करीत असल्याने अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर रात्रीसुद्धा प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळत आहे. रात्री १0 नंतर येणार्‍या जाणार्‍या गाड्यांची उद्घोषणा होत नसल्याने अक्षरश: फलाटांवर उभे असलेले प्रवासी स्थानकात प्रवेश करणारी गाडी कोणती, हे पाहण्यासाठी तिच्या दिशेने तुटून पडतात. बाहेरगावाहून अकोला मार्गे जाणार्‍या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत असल्यास, त्याबाबत अलीकडच्या बस स्थानकावर चौकशी करण्याऐवजी त्या किती वाजता अकोला बस स्थानकावर आल्या आणि गेल्या केवळ एवढ्यापुरतेच काम येथील रात्रपाळीचे अधिकारी करीत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. नादुरुस्त झालेल्या एखाद्या लांब पल्ल्याच्या गाडीला पर्याय म्हणून एकही शिल्लक गाडी अकोला विभागाकडे उपलब्ध नसल्याची माहिती आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांना सुविधा देण्यास एसटी महामंडळ असमर्थ ठरत असल्याचे स्पष्ट होते. (प्रतिनिधी)

** चौकशी अधिकर्‍यांशी वाद
अकोला मध्यवर्ती बस स्थानकावर रात्री येणार्‍या बहुतांश गाड्या चालकांकरवी फलाटांवर लावण्याऐवजी इतरत्र लावल्या जातात. यामुळे बरेचदा फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांना आलेली बस कोणती, हे अखेरपर्यंत कळत नाही. अशा वेळी गाडी चुकल्याने चौकशी अधिकार्‍याशी वाद घालण्यापलीकडे प्रवाशांसमोर दुसरा पर्याय उरत नाही.

**  सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी
मध्यवर्ती बस स्थानकावर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनमार्फत सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतात. दिवसा चार पुरुष व दोन महिला, तर रात्रीच्या वेळेसे दोनच पुरुष सुरक्षा रक्षक तैनात केले जातात. सुरक्षा चोख ठेवण्यासाठी ही संख्या कमी असल्याने गर्दीच्या काळात पाकीटमारांचे फावते.