शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकच्या अतिवापरामुळे प्रदूषणात वाढ

By admin | Updated: May 29, 2014 23:24 IST

प्लास्टिक कोटेड पत्रावळी आणि प्लास्टिकचे ग्लासचा अत्याधिक वापर होत आहे.

पातूर : लग्नकार्यासाठी लागणार्‍या वस्तूची विल्हेवाट लागत नसल्यामुळे प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकचे ग्लास सर्रास वापरण्यात येतात; परंतु हजारोच्या संख्येंनी असलेले हे ग्लास रस्त्यावर फेकून देण्यात येत असल्यामुळे प्रदूषण वाढीस हातभार लागत आहे. लग्न सराईत ग्रामीण भागात एकाच दिवसी अनेक लग्न सोहळे असतात. या लग्न सोहळ्यात जेवणासाठी प्लास्टिक कोटेड पत्रावळी आणि पाणी पिण्याकरिता डिस्पोजलचा अत्याधिक वापर होत आहे. जेवणाची पंगत उठल्यानंतर या पत्रावळी आणि डिस्पोजल परिसरात अस्ताव्यस्त टाकण्यात येत असतात. त्यावर उष्टे अन्नही असते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते. मंगल कार्यालयाच्या बाहेर या पत्रावळी, द्रोण, डिस्पोजल वाट्या फेकून दिलेल्या असतात. मात्र मंगल कार्यालयाचे संचालक किंवा वर-वधूकडील मंडळी या पत्रावळी, डिस्पोजलची विल्हेवाट लावण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दुगंर्धी निर्माण होते. पूर्वीच्या काळात पळस अथवा मोहाच्या पानाच्या पत्रावळी सर्वत्र राहत होत्या. आता त्याची जागा प्लास्टिकपासून निर्मित पत्रावळींनी घेतली आहे. या पत्रावळी प्लास्टिकच्या असल्याने जमिनीत गाडल्या तरी कुजत नाहीत. त्यामुळे पर्यावरणालाही धोका निर्माण होत असतो. यासाठी प्लास्टिक पत्रावळी, डिस्पोजलची योग्य विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे झाले आहे. या कामासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने यंत्रणा राबवावी, अशी मागणी होत आहे.