शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंसेवी संस्थांचा आखडता हात

By admin | Updated: July 13, 2014 21:36 IST

सौंदर्यीकरणासाठी ‘ग्रीन अकोला, क्लीन अकोला’ संकल्पना सादर केली.

अकोला : मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी शहराच्या सौंदर्यीकरणासाठी 'ग्रीन अकोला, क्लीन अकोला' संकल्पना सादर केली. मध्यंतरी काही स्वयंसेवी संस्थांनी बैठकीत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्पदेखील केला. मनपाकडे २३ हजार वृक्ष पडून असताना, लागवडीसाठी अनेकांनी आखडता हात घेतला. त्यामुळे 'ग्रीन अकोला' संकल्पनेला तडा जाण्याची शक्यता असल्याने अकोलेकरांनी समोर येण्याची गरज आहे. र्मयादित भौगोलिक क्षेत्रफळ व निर्माणाधीन इमारतींच्या बांधकामाचा परिणाम वृक्षांवर होत आहे. शहरातील सार्वजनिक जागा तसेच लेआऊटमधील खुल्या जागांवर अनधिकृत बांधकाम होत असल्याने मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. संपूर्ण शहरातील सांडपाणी थेट मोर्णा नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने जल प्रदूषणासह पर्यावरणाला धोका निर्माण झाला. जळगाव,अमरावती व नागपूर शहराच्या सौंदर्यीकरणात वृक्ष लागवडीमुळे भर पडली आहे. शिवाय हवेच्या प्रदूषणाला काही अंशी आळा बसला आहे. त्याच धर्तीवर मनपा आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी ह्यग्रीन अकोला क्लीन अकोलाह्ण संकल्पना अकोलेकरांसमोर ठेवली. शहर विकासाची दूरदृष्टी ठेवणार्‍या अधिकार्‍यांना अकोलेकरांच्या भक्कम पाठबळाची आवश्यकता आहे. मध्यंतरी अनेक स्वयंसेवी संस्थांनी शहराच्या विकासात ह्यखारीह्णचा वाटा उचलण्याची हमी देत, वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला. प्रशासनाने एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, तूर्तास २३ हजार वृक्ष जमा झाले आहेत. अनेक दानशूर व्यक्तींनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर निस्वार्थ भावनेने वृक्ष दिल्याची माहिती आहे; परंतु वृक्ष लागवडीसाठी मनपाकडे तेवढय़ा प्रमाणात ट्रिगार्ड उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण झाली. शिवाय, वृक्ष लागवड करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनीच आखडता हात घेतला. ही बाब लक्षात घेता, प्रशासनाने स्वत:च वृक्ष लागवडीला १२ जुलैपासून सुरुवात केली आहे.

** सुविधा हव्यात, दायित्वाचा विसर

सुंदर बगिचा, प्रशस्त व स्वच्छ रस्ते, पथदिवे, स्वच्छ पाणीपुरवठा, वॉकिंग ट्रॅक, पदपाथसह अतिक्रमणमुक्त अकोला सर्वांना हवे आहे. या सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी मनपावर ढकलल्या जाते; परंतु एक अकोलेकर या नात्याने आपले कर्तव्य व दायित्व काय, यावर कोणीही विचार करीत नाही. मनपाच्या सामाजिक उपक्रमात नगरसेवक, व्यापारी, उद्योजक, शिक्षण संस्था चालक, सामाजिक संघटनांसह सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी होण्याची गरज आहे. तरच खर्‍या अर्थाने अकोला ह्यग्रीनह्ण होईल.