शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दर महिन्यात आमच्यातील दोघांचा जातो जीव; ७ महिन्यांत १४ वाघ दगावले

By atul.jaiswal | Updated: July 29, 2024 09:59 IST

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन विशेष 

अतुल जयस्वाल, लोकमत न्यूज नेटवर्क, अकोला : राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाच्या संवर्धनासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असले, तरी चालू वर्षात जुलै महिन्यापर्यंत राज्यातील १४ वाघांचा मृत्यू विविध कारणांनी झाल्याची नोंद राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)च्या संकेतस्थळावर आहे. यावरून राज्यात महिन्याला सरासरी दोन वाघांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.

संवर्धनाचे प्रयत्न 

भारतीय वन्यजीव कायद्याच्या अनुसूचीमध्ये समावेश असलेल्या वाघाला संरक्षण लाभले असून, वाघाच्या संवर्धनासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. यानंतरही शिकार, नैसर्गिक मृत्यू, अपघात, आपसातील झुंजी आदी कारणांमुळे दरवर्षी वाघांचे मृत्यू होतात. देशभरात विविध कारणांमुळे होणाऱ्या वाघांच्या मृत्यूची नोंद राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण ठेवते.  

वाघांसाठी अभयारण्ये सुरक्षित

तीन वाघांचा मृत्यू (पेेंच- १, ताडोबा- २) अभयारण्याच्या हद्दीत झाला, तर उर्वरित ११ वाघ अभयारण्याबाहेर मृत्युमुखी पडल्याची नोंद ‘एनटीसीए’च्या संकेतस्थळावर आहे. 

जानेवारीत सर्वाधिक  मृत्यू

१४ वाघांपैकी पाच वाघ एकट्या जानेवारी महिन्यात दगावले. फेब्रुवारी महिन्यात दोन, मार्चमध्ये तीन, एप्रिलमध्ये एक, तर मे मध्ये तीन वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. 

 

टॅग्स :Tigerवाघ