शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
4
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
5
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
7
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
8
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
9
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
10
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
11
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
12
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
13
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
14
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
15
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
16
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
17
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
18
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
19
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
20
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

बोंडअळीने आक्रमण केल्याने १४ एकरातील पऱ्हाटी कापली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 10:56 AM

कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळी आल्याने उत्पादनच मिळत नसल्याचे चित्र आहे.

- विठ्ठल बोळे लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरगाव (अकोला): परतीच्या पावसाने आधीच खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले. त्यामुळे हजारो रुपयांचा खर्च लावलेल्या कपाशीतून केवळ ३५३ किलोच उत्पादन झाल्याने डोंगरगाव येथील तीन शेतकऱ्यांनी १४ एकरातील पºहाटी कापून टाकली आहे.डोंगरगाव येथील शेतकरी रमेश नारायण देवकर आणि गणेश देवकर यांनी नऊ एकर शेतामध्ये कपाशी पिकाची लागवड केली होती. पीक चांगले होते; मात्र ऐन बोंड्या लागण्याच्या काळात संततधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सततच्या पावसाने बोंड्या काळ्या पडल्या तर फुले आणि पाती गळून पडली. तरीही कपाशी पिकाला लागलेला खर्च निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. या आशेवर त्यांनी वेचणी केली असता नऊ एकर शेतामध्ये केवळ १ क्विंटल ५० किलो कापूस आला. पहिल्या वेचणीनंतर २० ते २५ दिवसांनीही कपाशी फुटली नाही. त्यामुळे त्यांनी शेतामध्ये पाहणी केली असता बोंडअळीने मोठ्या प्रमाणात आक्रमण केल्याचे आढळले. त्यांना ९ एकरात केवळ आतापर्यंत १५० किलो कापसाचे उत्पादन झाले. यामध्ये वेचणीसाठी ९ मजूर लागले. त्यांची मजुरी १ हजार ८०० रुपये झाले. कापसाचा दर्जा चांगला नसल्याने केवळ ३५०० रुपयांचा मिळाला. त्यामुळे आतापर्यंत लागलेला खर्चही निघाला नसल्याने हताश झालेल्या शेतकºयांनी ९ एकरातील पºहाटी कापून टाकली.हीच परिस्थितील संतोष रूपसिंग राठोड यांच्यावर आली. त्यांनी बाळासाहेब देशमुख यांची पाच एकर शेती पाच एकर पन्नास हजार रुपये देऊन केली. त्यामध्ये त्यांनी कपाशीची लागवड केली. पेरणीपासून तर आतापर्यंत कपाशीची मशागत, फवारणीसाठी हजारो रुपयांचा खर्च केला. कापसाची पहिली वेचणी केली असता, त्यांना केवळ २१३ किलो कापूस झाला. त्यानंतर कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळी आल्याने उत्पादनच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांनी हताश होऊन आपल्या पाच एकरातील पºहाटी कापून टाकली. ५० हजार रुपये देऊन त्यांनी शेती केली होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी