शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
4
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
5
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
6
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
7
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
8
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
9
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
10
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
11
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
13
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
15
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
16
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
17
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
18
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
19
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
20
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात ४0 टक्के पाऊस

By admin | Updated: July 25, 2014 01:11 IST

जनजीवन रुळावर; पेरण्यांची लगबग

अकोला: बुधवारी झालेल्या संततधार पावसानंतर गुरुवारी मात्र पावसाने उघाड दिली. २४ जुलैपर्यंत जिल्हय़ात वार्षिक सरासरीच्या ४0 टक्के २८४.६२ मिमी पाऊस झाला. दोन दिवसाच्या झडीनंतर पावसाने उघाड दिल्यामुळे ग्रामीण भागात शेतकर्‍यांनी गुरुवारी मोठय़ा प्रमाणात पेरण्या केल्या. एकाच दिवशी सर्वच शेतकरी पेरणी करीत असल्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली होती. मंगळवार व बुधवारी दोन दिवसात अकोला जिल्हय़ात १३९ मिमी पाऊस झाला. जिल्हय़ाची पावसाची सरासरी ६९७.३ मिमी असून, आतापर्यंत २८४.६२ मिमी पाऊस झाला आहे. जिल्हय़ात यावर्षी जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. १00 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याची सूचना कृषी विद्यापीठ व कृषी खात्याने केली होती. २२ जुलैपर्यंत जिल्हय़ात सरासरी ४0 मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे पेरण्या रखडल्या होत्या. गत दोन दिवसात १३९ मिमी पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.

** ५0 च्यावर जनावरांचा मृत्यू

जिल्हय़ातील शिवणी, शिवर, कुंभारी, सिसा, मासा, उदेगाव या गावातील ५0 च्या वर जनांवरांचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आहे. तर सुमारे ५0 जनावरांची प्रकृती गंभीर आहे. मंगळवार व बुधवारी दोन दिवस जिल्हय़ात संततधार पाऊस झाला. त्यामुळे पशू गोठय़ात किंवा एकाच ठिकाणी होते. या जनांवरांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जनावरांना दोन दिवस चारा मिळाला नाही. जनावरे पावसामुळे बाहेर चरण्यासाठी जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पशुचिकित्सकांनी व्यक्त केला आहे. अवस्थ जनावरांवर उपचार करण्यात येत आहे. या जनांवरांचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नीलेश डेहनकर यांनी केली आहे.

** काटेपूर्णाची पातळी वाढली एक टक्क्याने

गत दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्हय़ातील धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा प्रकल्पात १९.३६ दलघमी एवढा जलसाठा आहे. याची टक्केवारी २२.४२ टक्के आहे. दोन दिवसांपूर्वी २१.६८ टक्के जलसाठा होता. पातूर तालुक्यातील मोर्णा धरणात १२.७५ दलघमी ३0. ७४ टक्के जलसाठा आहे. निगरुणा प्रकल्पात ६.३१ दलघमी २१.८७ टक्के जलसाठा आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पात १.१0 दलघमी ९.४३ टक्के जलसाठा आहे. तर दगडपारवा प्रकल्पात अजूनही मृत जलसाठा आहे.