शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत प्रस्थापितांच्या विरोधात लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST

श्रीगोंदा : बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी नागवडे साखर कारखाना निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांना साथ देण्याचा निर्णय ...

श्रीगोंदा : बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी नागवडे साखर कारखाना निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील विधानसभा निवडणूक समोर ठेवून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तिसरी आघाडी करून प्रस्थापित मंडळींना आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

नाहाटा यांनी आढळगावमध्ये (ता. श्रीगोंदा) समर्थक कार्यकर्त्यांची गुरुवारी बैठक घेतली. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या आठ आणि पंचायत समितीच्या सर्व सोळा गणांत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत अण्णासाहेब शेलार यांना उभे करून आमदार बबनराव पाचपुते यांना रोखण्याचा डाव नाहाटा यांनी त्यावेळी टाकला होता. मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यानंतर शेलारांबरोबर काम केले आणि आपले लक्ष साध्य केले.

२०१४ ला राष्ट्रवादीचे राहुल जगताप यांना साथ केली आणि बबनराव पाचपुतेंना रोखले. मात्र, २०१९ ला पुन्हा बबनराव पाचपुतेंना मदत केली. पाचपुते सातव्यांदा आमदार झाले. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत नाहाटांनी केलेले घातकी राजकारण पाचपुते विसरलेले नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून अण्णासाहेब शेलार व बाळासाहेब नाहाटा यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत अण्णासाहेब शेलारांना झटका दाखविण्यासाठी नाहाटांनी डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे.

आढळगावमध्ये त्यांनी निवडक कार्यकर्त्यांशी याबाबत चर्चा केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आढळगावचा उमेदवार उभा करून नवा इतिहास घडवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बेलवंडी गटात तीन उमेदवार उभे करून या गटावर तिसऱ्या आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी बेलवंडी गावातील अण्णासाहेब शेलार यांचा समर्थक फोडण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कालचे हातात हात घालून काम करणारे मित्र हे राजकीय शत्रू म्हणून समोरासमोर येणार आहेत.

---

कोण-कोण राहणार सोबत..

बाळासाहेब नाहाटा यांनी प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नाहाटा हे प्रस्थापित मंडळींच्या रडारवर आहेत. अशा तापलेल्या रणसंग्रामात नाहाटांच्या रथाचे सारथ्य संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस करीत आहेत. नाहाटांच्या भूमिकेला साथ देण्यासाठी कोण कोण पुढे येतात, सच्चे मित्र काय कानमंत्र देतात, यावरच नाहाटा पुढचे पाऊल टाकण्याचे धाडस करतील, अशी चर्चा आहे.

-----

बाळासाहेब नाहाटा