शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही घोंगडं अंगावर टाकलं, तुमचा प्रश्न मी सोडवतो

By admin | Updated: June 1, 2014 00:22 IST

गोपीनाथ मुंडे : अहिल्यादेवींच्या कारभारासारखे काम करू

जामखेड : देशात भाजपा व घटक पक्षाच सरकार सत्तेत आले आहे. अहिल्यादेवींनी जसा राज्यकारभार केला त्याचप्रमाणे आम्ही राज्य कारभार करण्याचे वचन देतो. तुम्ही सत्काररूपात घोंगडी अंगावर टाकली आहे. आता तुमचे प्रश्न माझ्या अंगावर घेतले आहेत. आरक्षण मुद्याला न्याय देऊ, अशी ग्वाही केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी दिली. अहिल्यादेवींचे जन्मस्थळ असलेल्या चोंडी गावी २८९ वी जयंती व धनगर समाजाचा मेळावा राष्टÑीय समाज पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, रासप अध्यक्ष महादेव जानकर, प्रदेशाध्यक्ष पुंडलिक काळे, खा.दिलीप गांधी, खा.सदाशिव लोखंडे, आ. राम शिंदे, आ. प्रकाश शेंडगे, आ. अनिल गोरे, आ. माधुरी मिसाळ, रिपाइं जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, सुशिला मोराळे, नामदेव राऊत, अशोक खेडकर, सुर्यकांत मोरे, प्रा. लक्ष्मण ढेपे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. प्रारंभी मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुंडे म्हणाले, अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त मी दरवर्षी येतो. यावेळी परिवर्तन घेऊन आलो आहे. त्यामुळे मोठा जनसमुदाय आला आहे. महादेव जानकरांनी बारामतीमधून चांगली झुंज दिली. तो वाघ आहे. पडला तरी तोंड लपून बसला नाही. त्याला बारामतीला उभा करण्याचा माझा निर्णय योग्यच होता. बारामतीचा खासदार आपला आला नसला तरी आता बारामतीचा आमदार पाडायचा आहे व आपला आणायचा आहे. जानकरांना आमदार नाही तर खासदार करणार आहे, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली. दिल्लीत राज्य आले आहे. राज्यात परिवर्तन होणार असल्याने तुमचा आरक्षणाचा प्रश्न मी सोडवील. महाराष्टÑ राज्याबाबत भेदभाव करणार नाही. त्यांना सांगतो तुम्ही पैसे मागा कमी पडू देणार नाही. जमिन अधिग्रहणसंबंधी कायदा संमत केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची जमिनीला चारपट भाव मिळणार आहे. आता महाराष्टÑाच्या परिवर्तनाला साथ द्या, अशी हाक मुंडे यांनी जनसमुदायाला केली. (तालुकाप्रतिनिधी)देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींच्या आशीर्वादाने देशात परिवर्तन झाले आहे. आता आॅक्टोबरमध्ये एकदा परिवर्तन करा. धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी केंद्रातील सरकार एकटे काही करू शकत नाही. त्यासाठी राज्य सरकारने शिफारस करावी लागते. त्यामुळे राज्यात आपलेच सरकार आणावे लागणार आहे. ४महादेव जानकर म्हणाले, मुंडे यांनी मला महायुतीत आणून माझी उंची वाढवली आहे. त्यांनी वडिलासारखे प्रेम माझ्यावर केले आहे. आता चोंडीतून रेल्वे जाईल, अशी आमची मागणी आहे. ती पूर्ण करा.