शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉक होताच अपघात विभागात वाढली गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने राज्यात ६ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने राज्यात ६ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू केले होते. त्यामुळे नागरिकांनादेखील बाहेर पडण्यास मर्यादा आल्या होत्या. तसेच अत्यावश्यक सेवेची वाहतूक वगळता रस्त्यावर इतर वाहनांची गर्दी कमी होती. मात्र, काही दिवसांपासून बाधित येणाऱ्या रुग्णाची संख्या घटल्याने अनलॉक करण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने अनलॉक होताच शासकीय तसेच रुग्णालयांच्या अपघात विभागात गर्दी वाढली आहे.

कोपरगाव तालुका हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रथम जिल्हा मार्ग यासह ग्रामीण पातळीवरील रस्त्यांचे जाळे पसरलेले आहे. त्यात राष्ट्रीय महामार्ग वगळता राजमार्ग यासह इतर सर्वच रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान नगर-मनमाड, कोपरगाव - श्रीरामपूर या राज्य मार्गावर वाहनांचे प्रमाण अत्यल्प होते. गेल्या काही वर्षात या मार्गाची दैन्यावस्था झालेली आहे. परंतु, अनलॉकनंतर या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे, त्यामुळे कोपरगाव तालुका हद्दीत वाहनाचा अपघात नित्याचा झाला आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात अपघातात तसेच अनैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्यांची संख्या ३५७ इतकी आहे. यात बहुतांश मृत्यू हे अपघातामुळे झाले असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

...........

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात ३ वर्षात नोंद झालेले मृत्यू

२०१९ - ११९

२०२० - १०६

२०२१ ( २१ ऑगस्टपर्यंत ) - १३२

...........

दारू हेही एक कारण

अनलॉकमध्ये दारूची दुकाने तसेच महामार्गावरील हॉटेल खुले झाले आहेत. त्यामुळे वाहन चालविताना चालक हे दारू पिऊन वाहन चालवितात त्यातून अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच अल्पवयीन मुले देखील सर्रासपणे वाहन चालविण्याचे प्रमाण वाढलॆ आहे. त्यामुळेसुद्धा अपघात होत आहेत.

........

ग्रामीण रुग्णालयात मागील तीन वर्षांपासून तर आत्तापर्यंत ३५७ अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी १३० या आत्महत्या असून उर्वरित २२७ मृत्यू हे विविध अपघातातील आहेत. बऱ्याचदा अपघात झाल्यानंतर उपचारासाठी अथवा अपघातात जागीच मृत्यू झाल्यास शवविच्छेदनासाठी शिर्डीसह इतरत्र नेले जाते. त्यामुळे हा आकडा आणखीही जास्त असू शकतो.

- डॉ. कृष्णा फुलसौंदर, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव

...............

स्टार १०६३