शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

निर्जन स्थळ बनले गुन्हेगारांचे अड्डे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:23 IST

अहमदनगर : शहर व परिसरातील निर्जन स्थळे गुन्हेगारांचे अड्डे बनली असून अशा ठिकाणी लूटमार व महिलांच्या छेडछाडीचेही प्रकार घडत ...

अहमदनगर : शहर व परिसरातील निर्जन स्थळे गुन्हेगारांचे अड्डे बनली असून अशा ठिकाणी लूटमार व महिलांच्या छेडछाडीचेही प्रकार घडत आहेत. अशा ठिकाणी पेट्रोलिंग होत असली तरी गुन्हेगार पोलिसांची नजर चुकवून गुन्हे करत आहेत.

शहरातील सरोज टाकी परिसरातील मोकळे मैदान, बालिकाश्रम ते बोल्हेगाव रस्ता, तपोवन रोडवरील भिस्तबाग महाल परिसर, कल्याण रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज, जुने आरटीओ कार्यालय परिसर, बालिकाश्रम रस्त्यावरील कृषी कार्यालय परिसर आदी ठिकाणी बसून गुन्हेगार दारू, गांजा रिचवतात आणि रात्री चोऱ्या, घरफोड्या, रस्ता लूट करतात तसेच एकटी महिला दिसली की, छेडछाडीचेही प्रकार घडतात. अशा ठिकाणी पोलिसांनी रात्रीची पेट्रोलिंग वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

--------------

ही ठिकाणे धोक्याची

शहराजवळील चांदबीबी महाल, मांजरसुंबा, गोरक्षनाथ गड, वांबोरी घाट, केकताई परिसर आदी ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने जातात. सध्या पावसाळा असल्याने येथे फिरायला जाणाऱ्यांचीही मोठी संख्या आहे. चोरटे आणि रोडरोमिओ यांच संधीचा फायदा घेतात. डोंगरात अथवा घाट परिसरात लपून बसलेले चोरटे पर्यटकांना अडवून लूटमार करतात तसेच महिलांच्या छेडछाडीचेही अनेक प्रकार या परिसरात घडले आहेत.

-------------------

रात्रीचा प्रवास ठरतोय घातक

नगर-पुणे रोडवरील चास परिसर, वांबोरी घाट, नगर-औरंगाबाद रोडवरील इमामपूर घाट, निंबळक बायपास, कल्याण रोडवरील मार्केट यार्ड रस्ता आदी ठिकाणी रात्री वाहनचालकांना अडवून लूटमारीच्या घटना वाढल्या आहेत. लुटारू एकटे वाहन दिसले की, दुचाकी अडवी लावून त्यांना थांबवितात. हत्यारांचा धाक दाखवून त्यांच्याकडील मुद्देमाल हिसकावला जातो. बहुतांशी वेळा वाहनचालक व इतर प्रवाशांना मारहाण केली जाते. त्यामुळे या परिसरातील रात्रीचा प्रवास घातक ठरत आहे.

----------------------

पोलिसांकडे ठिकाणांची यादी पण...

ज्या ठिकाणी वारंवार लूटमारीच्या घटना घडत आहेत, अशा ठिकाणांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. या परिसरात रात्रीतून एकदा किंवा दोनदा पेट्रोलिंग केली जाते. चोरटे मात्र पोलिसांचे वाहन येऊन गेले की, प्रवाशांना लक्ष्य करतात. त्यामुळे नियमित पेट्रोलिंग सुरू असली तरी लूटमारीच्या घटना थांबायला तयार नाहीत.