शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर महाविद्यालयात ऑनलाईन आतंकवाद विरोधी दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:20 IST

दरवर्षी भारतामध्ये २१ मे हा दिवस आतंकवाद विरोधी दिवस पाळला जातो. या दिवशी १९९१ साली भारताचे माजी पंतप्रधान ...

दरवर्षी भारतामध्ये २१ मे हा दिवस आतंकवाद विरोधी दिवस पाळला जातो. या दिवशी १९९१ साली भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली होती. आतंकवादसारख्या अमानवी गोष्टींमुळे अनेक निष्पाप बळी जातात. लोकांच्या मनात मरणाची भीती निर्माण होते. मानवी अधिकाराच्या विरुद्ध असणाऱ्या या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आणि परस्परांप्रती सद्भावना निर्माण व्हाव्यात याकरिता आतंकवाद, आतंकवादी लोकांच्या अमानवीय गोष्टी यामुळे अनेक निष्पाप लोकांचा जीव जातो. त्यांच्यामध्ये मरणाची भीती निर्माण केली जाते. त्यामुळे या मानवी अधिकारांच्याविरुद्ध असणाऱ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आणि पुन्हा प्रेम आणि सद्‌भावनेने लोकांना जिंकण्यासाठी आतंकवाद विरोधी दिन पाळला जातो.

या दिवसाचं औचित्य लक्षात घेऊन तरुणांसह समाजातील सामान्यांना आतंकवाद विरुद्ध राहण्यासाठी शपथ दिली जाते. ऑनलाईन पद्धतीने ‘आतंकवाद विरोधी शपथ’ या उपक्रमात ९ विद्यापीठांशी संलग्न ११५ महाविद्यालयांतील ९१५ व्यक्तींनी सहभाग घेतला घेतला. राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुनील कवडे आणि उन्नत भारत अभियानचे समन्वयक विलास नाबदे यांनी नियोजन केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गायकर, डॉ. अरविंद नागवडे, डॉ. सय्यद रझाक, रजिस्ट्रार दीपक अल्हाट, डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांनी परिश्रम घेतले.