शेताला आले तळ्याचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST2021-09-08T04:26:08+5:302021-09-08T04:26:08+5:30
एक महिना पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. घास, कपाशी, वांगी, ...

शेताला आले तळ्याचे स्वरूप
एक महिना पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. घास, कपाशी, वांगी, ऊस आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे पीक जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. यंदा समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. एक महिना पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले होते. मात्र, खंड पडल्यानंतर पावसाने जोरदार मुसंडी घेतली होती. त्यामुळे वारंवार पडणाऱ्या पावसामुळे शेतातील उभी पिके पिवळी पडू लागली आहेत. पिकाच्या मुळ्या कुजू लागल्या आहेत. शेतातील पाणी काढून देण्यासाठी चर राहिले नाहीत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतमालाला भाव नाही. चारा पिकांवर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहेत. मात्र, चारा पिके ही कुजू लागल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
...............
दोन एकर वांग्याची लागवड केली आहे. सुमारे एक ते सव्वा लाखाच्या आसपास खर्च झाला आहे. सध्या वांग्याचा तोडा सुरू आहे. लाखो रुपये खर्च करून झालेला खर्च निघणे मुश्किल झाले आहे. शासनाने तातडीने पीक पाहणी करून पंचनामे करावेत. नुकसानभरपाई द्यावी.
- अजय भांड, वांगी उत्पादक, शेतकरी
070921\20210907_081150.jpg
अति पावसामुळे शेतातील उभी पिके संकटात ,शेताला आले तळ्याचे स्वरूप