शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड तालुका होणार तुरीचे आगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:20 IST

जामखेड : कडधान्याचा असणारा तुटवडा व तुरीच्या डाळीची मागणी यामुळे तालुका कृषी खात्याने यावर्षी खरीप हंगामात ‘एक तालुका एक ...

जामखेड : कडधान्याचा असणारा तुटवडा व तुरीच्या डाळीची मागणी यामुळे तालुका कृषी खात्याने यावर्षी खरीप हंगामात ‘एक तालुका एक वाण’ ही संकल्पना राबवून बीडीएन ७११ या वाणाची १५ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड करण्याचे धोरण राबविले आहे. खर्चिक व मेहनती असलेल्या बाजरी व कपाशीला फाटा देऊन शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देणाऱ्या तुरीचे आगार म्हणून तालुक्याची ओळख निर्माण करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे.

केंद्र सरकारने कडधान्याला प्राधान्य दिले आहे. मागील वर्षी कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण घेतले होते. कडधान्य पिकाचे महत्त्व व तुरीच्या पिकामधून आर्थिक उत्पादन कसे अधिक भेटू शकते, याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक गावात चावडीवर जाऊन राजेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत ११ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पेरा झाला होता.

तूर लागवड सोपी असून कमी मेहनत व यांत्रिकद्वारे काढता येत असल्याने तसेच आधारभूत किंमत साडेपाच हजार क्विंटल आहे. मागणी जास्त असल्यामुळे तुरीचा दर ८ हजार क्विंटलपर्यंत गेला होता. यामुळे नगदी पीक म्हणून तुरीकडे पाहता येईल. मागील तीन वर्षांचा तूर पेरा पाहिला तर आलेख वाढत आहे. २०१८-१९ साली ७ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात लागवड झाली होती. २०१९-२० मध्ये ८ हजार ७०० व २०२०- २१ मध्ये ११ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पेरा झाला.

२०२१-२२ साठी १५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचा मानस तालुका कृषी खात्याचा आहे.

मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे बीडीएन ७११ हा पांढऱ्या तुरीचा वाण विकसित केला आहे. ती प्रक्रिया येथे अंगीकारली जात आहे. बीजप्रक्रिया करताना ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा व २५ ग्रॅम रायझेबियम प्रति किलो बियाण्यास लावावे. यामुळे १० ते १५ टक्के उत्पादनात वाढ होते. यानंतर ५ बाय २ फुटांवर लागवड करावी. तुरीचे पीक ४५ दिवसांचे झाल्यानंतर शेंडा खुडावा व तूर फुलोऱ्यात आल्यानंतर लिंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी बीडीएन ७११ हा पांढरा वाण उत्पादन देण्यास इतर वाणापेक्षा सरस ठरला आहे. पाणी, खते व किडीचे व्यवस्थापन केल्यास एकरी १० ते १५ क्विंटल उत्पादन मिळते.

---

बीडीएन ७११ या पांढऱ्या वाणाची तूर मागील वर्षी पेरली होती. हा वाण काढणीला लवकर येतो. तुरीला भरपूर शेंगा येतात. संपूर्ण तूर एकाच वेळी परिपक्व होते. ११५ ते १२० दिवसांत पीक काढण्यास येते. यंत्राद्वारे झटपट काढता येते. एकरी १२ क्विंटल उतारा पडला होता. यावर्षी २० एकर क्षेत्रावर लागवड करणार आहे.

-नानासाहेब ढवळे,

हळगाव, तूर उत्पादक

---

सध्या कडधान्याचा असणारा तुटवडा व डाळीची मागणी पाहता शेतकऱ्यांनी बीडीएन ७११ या पांढऱ्या विकसित वाणाची लागवड करावी. कमी खर्चात व मनुष्यबळाअभावी उत्पादन घेता येते व आधारभूत किमतीपेक्षा जास्त दर मिळून शेतकरी आपली आर्थिक उन्नती करू शकतो. तालुक्यातील १५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात एक तालुका एक वाण ही संकल्पना राबविणार आहे.

--सुधीर शिंदे,

तालुका कृषी अधिकारी