शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

विमा हप्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांचा खिसा कापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : राज्य शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या ‘विमा छत्र’ योजनेच्या वाढलेल्या हप्त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : राज्य शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या ‘विमा छत्र’ योजनेच्या वाढलेल्या हप्त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांचाच खिसा कापला जाणार आहे. विमा हप्ता सरकारऐवजी कर्मचाऱ्यांनाच स्वत: भरावा लागत आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना तर हा विमा काढणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यरत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसानच सहन करावे लागणार आहे.

सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना २०१४ पासून वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी विमाछत्र योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचे दरवर्षी नूतनीकरण करण्यात येते. त्यानुसार वित्त विभागाने १६ जुलै २०२१ रोजी आदेश काढून या योजनेंतर्गत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना भरावयाच्या विमा हप्त्याचे सुधारित दर जाहीर केले आहेत. १ जुलै २०२१ ते ३० जून २०२२ या कालावधीसाठी हे विमा हप्त्याचे सुधारित दर लागू असणार आहेत. या वर्षात निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना ही विमा योजना सक्तीची राहणार आहे.

न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीमार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनेचे हप्ते दरवर्षी वाढत आहेत. या योजनेचा विमा हप्ता बाजारभावापेक्षा कमी व वाजवी असावा, असे सरकार व अधिकारी, कर्मचारी संघटनांच्या चर्चेत अनेक वेळा ठरले होते. मात्र दरवर्षी सरकारचा वित्त विभाग वाढीव दर जाहीर करीत आहे. यामुळे शासकीय कर्मचारी, अधिकारी यांचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे दिसते आहे. सदरचा शासन निर्णय तत्काळ रद्द करून विमा हप्त्याची रक्कम निम्मी करावी, अशी मागणीच निवृत्त अधिकारी, कर्मचारी करीत आहेत.

----------

असे वाढले हप्त्याचे दर

वर्ष १० लाख विमा ५ लाख विमा

२०१७ २३००० १६८००

२०१८ ३९००० २१८००

२०१९ ७१३०० ३२४५०

२०२० ७८५२९ ३५६९५

२०२१ ९१०३० ४७६१०

---------------------

सरकारने सेवेतील तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनातून ३ टक्के रक्कम काढून घ्यावी आणि कर्मचाऱ्यासह त्याच्या जोडीदाराला मरेपर्यंत आरोग्य सुविधा दिल्या पाहिजेत. केंद्र सरकार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून निवृत्तीच्या वेळी एक रकमी ६० हजार रुपये घेते आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्याच्या जोडीदाराचा औषधोपचारासह सर्व खर्च मरेपर्यंत करते. हाच नियम राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनाही लागू व्हायला पाहिजे.

- जयप्रकाश संचेती, निवृत्त अभियंता, अहमदनगर

--------------

विमा छत्र योजनेतील त्रुटी

१) खासगी असो की सरकारी कंपनीत त्यांचे मालक वैद्यकीय खर्चाचा भार उचलतात. त्यामुळे सेवेमधील कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम पॉलिसीचा हप्ता भरायला लावणे चुकीचे आहे.

२) सेवेतील कर्मचारी अविवाहित असताना त्याला फक्त स्वत:चा विमा काढता येतो, परंतु त्याने विवाह केला की त्याला १ अधिक ३ (स्वत:, पत्नी, २ मुले) विमा घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. लग्न झाले की लगेच दोन मुले होत नाहीत. त्यामुळे ही सक्ती अयोग्य आहे. १० लाख विमा छत्रासाठी एकटा असताना ८,६०० रुपये असलेला प्रिमिअम लग्न झाले की लगेच ५,६७६० इतका करण्यात आला आहे. ही रक्कम फार तर दुप्पट व्हायला पाहिजे होती, मात्र त्यात सातपट वाढ झाली आहे.

३) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कर्मचारी आणि त्याचा जोडीदार (पती किंवा पत्नी) या दोघांसाठी १० लाख विमा छत्राचा प्रिमिअम ९१०३० आहे. परंतु जोडीदार हयात नसेल तर एकट्यासाठी ५६,९४० इतका आहे. यावरून विमा कंपनी लूट करीत असल्याचे दिसते.

४) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी १० लाख विमा कवचासाठी ९१,३०० प्रिमिअम असेल तर एका व्यक्तीसाठी ४५,५१५ असायला हवा. तो ५६,९४० करण्यात आला आहे.