शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

विमा हप्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांचा खिसा कापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : राज्य शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या ‘ विमा छत्र ’ योजनेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : राज्य शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या ‘ विमा छत्र ’ योजनेच्या वाढलेल्या हप्त्यामुळे आणि तो हप्ता स्वत: भरावा लागत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा खिसा कापला जाणार आहे. वर्षभरात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना तर हा विमा काढणे सक्तीचे करण्यात आले आहे.

सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना २०१४ पासून वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी विमा छत्र योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचे दरवर्षी नूतनीकरण करण्यात येते. त्यानुसार वित्त विभागाने १६ जुलै २०२१ रोजी आदेश काढून विमा हप्त्याचे सुधारित दर जाहीर केले आहेत. १ जुलै २०२१ ते ३० जून २०२२ या कालावधीसाठी हे दर लागू असतील. न्यू इंडिया इन्शुरन्स को-ऑप. कंपनी लि. मार्फत राबविल्या जाणाऱ्या या ग्रुप विमा योजनेचे हप्ते दरवर्षी वाढत आहेत. या योजनेचा विमा हप्ता बाजारभावापेक्षा कमी व वाजवी असावा. विमा हप्त्याची रक्कम निम्मी करण्याची मागणी निवृत्त अधिकारी, कर्मचारी व संघटनांचे प्रतिनिधी करीत आहेत.

----------

असे वाढले हप्त्याचे दर

वर्ष १० लाख विमा ५ लाख विमा

२०१७ २३००० १६८००

२०१८ ३९००० २१८००

२०१९ ७१३०० ३२४५०

२०२० ७८५२९ ३५६९५

२०२१ ९१०३० ४७६१०

---------------------

सरकारने सेवेतील तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनातून ३ टक्के रक्कम काढून घ्यावी आणि कर्मचाऱ्यासह त्याच्या जोडीदाराला मरेपर्यंत आरोग्य सुविधा दिल्या पाहिजेत. केंद्र सरकारप्रमाणे कर्मचाऱ्यांकडून निवृत्तीच्या वेळी एक निश्चित रक्कम घेऊन सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्याच्या जोडीदाराचा औषधोपचारांसह सर्व खर्च मरेपर्यंत करावा.

- जयप्रकाश संचेती, निवृत्त अभियंता, अहमदनगर

--------------

अशा आहेत त्रुटी

सेवेमधील कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम पॉलिसीचा हप्ता कर्मचारी भरतात. तो सरकारने भरावा. सेवेतील कर्मचारी अविवाहित असताना त्याला फक्त स्वत:चा विमा काढता येतो, परंतु त्याने विवाह केला की त्याला १ अधिक ३ (स्वत:, पत्नी, २ मुले) असा चार जणांचा विमा घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. सेवेतील व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एकट्याची विम्याची रक्कम जास्त आकारली असल्याचे निवृत्त कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

----------

कंपनी म्हणते फायद्याचे

बाजारभावाच्या तुलनेत विमा हप्त्याची रक्कम योग्य आहे. ६० वर्षांवरील निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे जीवन आरोग्यदृष्ट्या जास्त धोक्याचे (रिस्की) असते. प्रत्यक्षात वैद्यकीय खर्च मोठा असतो. त्यातुलनेत विम्याची रक्कम अल्प आहे. पहिल्या दिवसापासून विमा योजना लागू होते, त्यामुळे ही योजना व एकरकमी हप्ता फायद्याचे असल्याचे संबंधित विमा कंपन्यांच्या सूत्रांनी सांगितले.