शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून ऊस पेटवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:29 IST

शेवगाव (जि. अहमदनगर) : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून पाच एकर ऊस पेटून दिल्याची घटना सोनविहीर गावच्या (ता. शेवगाव) ...

शेवगाव (जि. अहमदनगर) : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून पाच एकर ऊस पेटून दिल्याची घटना सोनविहीर गावच्या (ता. शेवगाव) शिवारात घडली असून याप्रकरणी मंदा ज्ञानदेव विखे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल केली. त्याअगोदर दोन गटाने निवडणुकीच्या वादातून परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर निघालेले सरपंचपदासाठीचे आरक्षण या वादाला कारणीभूत ठरले. मतमोजणीनंतर एका गटाला चार तर दुसऱ्या गटाला तीन जागा मिळाल्या होत्या. सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले. कमी जागा असलेल्या गटाकडे राखीव जागेचा उमेदवार आहे. त्यामुळे हा वाद उफाळून आला, असे एका नवनिर्वाचित सदस्याने सांगितले. या वादातून शेवगाव पोलीस ठाण्यात दोन्ही गटाने परस्परविरोधी फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हे दाखल झाले.

याबाबत पहिली फिर्याद नामदेव सखाराम विखे यांनी दिली. नामदेव विखे यांच्या मंडळाचे चार तर प्रतिस्पर्धी मंडळाचे तीन उमेदवार विजयी झाले. विखे यांच्या मंडळातील त्यांचे बंधू ज्ञानदेव सखाराम विखे यांच्याकडून विक्रम दगडू विखे हे पराभूत झाले. त्याचा राग येऊन गुरुवारी (दि.२८ ) विक्रम दगडू विखे, प्रमोद प्रल्हाद विखे, महेश दिलीप विखे, अण्णासाहेब श्रीकिसन विखे, बाप्पासाहेब अशोक विखे, संभाजी सुदाम तिडके आदींनी लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुसरी फिर्याद दिलीप प्रल्हाद विखे यांनी दिली. ज्ञानदेव सखाराम विखे, नामदेव सखाराम विखे, शरद तुकाराम विखे, बाप्पासाहेब शरद विखे, रावसाहेब अंबादास विखे, मच्छिंद्र दगडू विखे, दिलीप हरिभाऊ विखे आदींनी जमावाने येऊन लाथाबुक्क्याने व दगडाने मारहाण केल्याचे दिलीप विखे यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

शनिवारी (दि. ३०) मंदा ज्ञानदेव विखे यांनीही एक फिर्याद दिली. ज्ञानदेव सखाराम विखे व दीर नामदेव सखाराम विखे यांच्या नावावर असलेल्या गट नंबर १४३ मधील पाच एकर क्षेत्रावर १३ महिन्यांपूर्वी ऊस लागवड केली होती. शुक्रवारी (दि.२९) रात्री नऊच्या सुमारास तुळशीराम हरिभाऊ विखे यांनी मंदा विखे यांना फोन केला. सुदाम पांडुरंग तिडके, अमोल शिवाजी तिडके, हरिभाऊ कडूबा शिंदे यांनी टेंभा घेऊन ऊस पेटून दिला, असे सांगितले. त्यावेळी घराबाहेर येऊन पाहिले असता शेताच्या दिशेने मोठा जाळ असल्याचे दिसले, असे मंदा विखे यांनी फिर्यादी म्हटले आहे.